शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेला ब्रेक, शाळांना दिलासा

By admin | Updated: June 28, 2016 00:14 IST

शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील चौथीच्या वर्गाला पाचवी आणि सातवीच्या वर्गाला आठवीचा वर्ग जोडण्याचे आदेश देण्यात आले होते.

आदेश : खासगी शाळांचा जीव भांड्यातअमरावती : शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील चौथीच्या वर्गाला पाचवी आणि सातवीच्या वर्गाला आठवीचा वर्ग जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या आदेशाला शिक्षक संघटनांनी विरोध केल्याने जिल्ह्यातील केवळ ३० ते ४० टक्के शाळांमध्येच चौथीच्या वर्गाला पाचवीचे आणि सातवीच्या वर्गाला आठवीचे वर्ग जोडले गेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक पुनर्रचना मोहिमेला ब्रेक लागला. शासनाने पहिली ते पाचवीला प्राथमिक शिक्षणाचा सहावी ते आठवीला उच्च प्राथमिक शिक्षणाचा नववी व दहावीला माध्यमिक शिक्षणाचा तर अकरावी व बारावीला उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा देत शैक्षणिक पुनर्रचना केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळेत चौथीपर्यंत आहेत त्यात पाचवीचा व ज्यात सातवीपर्यंतचे वर्ग आहेत त्याला आठवीचा वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. चौथी व सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकेच्या शाळात पाचवी व आठवीचे वर्ग सुरू झाले तर अनुदानित शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका संघटनांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा एक परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घ्यावे हे ठरविण्याचा अधिकार पालकांचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला मागितला तर शाळेला तो रोखून ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. हे परिपत्रक काढून शासनाने याप्रकारे विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अडविण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी सूचना केली होती. परिणामी जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्येच चौथीपर्यंतच्या शाळेत पाचवीला व सातवीपर्यंतच्या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्याचे काम झाले आहे. दुसरीकडे एप्रिल महिन्यात शासन आदेश आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली होती. (प्रतिनिधी)विषय शिक्षकांची पदे रिक्तजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू झाल्यास विषय शिक्षकांची पदे भरावी लागतील. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत विषय शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे पदवीधर शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.-तर स्थिती गंभीरमाध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या बरीच आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू झाले, तर माध्यमिक शाळांमधील अनेक तुकड्या बंद होतील. तसे झाले तर प्रत्येक शाळेत दोनपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांमध्ये पाचवीचे व सातवीपर्यंतच्या शाळांत आठवीचे वर्ग सुरू करण्याची सक्ती शासनाने केली होती. परंतु आरटीईनुसार पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत शिकवावे, याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी राहतील. म्हणून नवीन वर्ग सुरू करण्यास अडचणी आलेल्या आहेत.- एस. एम. पानझाडे,शिक्षणाधिकारी प्राथमिक