शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणीगणेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना संसगार्मुळे ...

अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना संसगार्मुळे दोन वर्षांपासून प्रत्यक्ष प्राणीगणना होत नाही. त्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरिण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांची संख्या किती? हे निश्चित करणे कठीण झाले आहे.

वनविभाग अथवा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांची ऑनलाईन नोंदणी मागविली जाते. पंरतु, गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले आणि मे महिन्यात होणारी प्राणीगणना बंदच आहे. यंदाही बुद्ध पौर्णिमेला हीच स्थिती होती. वन विभागाने प्राणी गणना होणार नाही, असे अगोदर स्पष्ट केले आहे. प्राणी गणना ही कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर करण्यात येते. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना प्राणीगणना करता यावी, यासाठी पाणवठे परिसरात मचाणी उभारल्या जातात. सायंकाळी ४ ते सकाळी १० वाजता दरम्यान ही प्रत्यक्ष प्राणीगणा केली जाते. चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यावर नेमके कोणत्या प्रकारातील पक्षी, प्राणी आढळून आले, याची माहिती प्रगणेतून नोंदविली जाते. मात्र, दोन वषार्पासून जंगल, व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसगार्मुळे पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना एन्ट्री नाही. त्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष वन्यजीवांचे दर्शन कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

-------------------

प्राणी, पक्षी प्रगणनासाठी विशिष्ट फार्म

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फार्म उपलब्ध करुन दिला जातो. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना पाणवठ्यावर प्रगणना करताना कोणत्या प्रकारचा प्राणी, पक्षी दिसून आला. याबाबतची नोंद चित्रासमोर करावी लागते. पक्षी, प्राण्यांची ओळख करून तो कोणत्या प्रजाती, प्रकारातील आहे, याचे अवलोकन केले जाते. जंगल अथवा व्याघ्र प्रकल्पात वन बीटनिहाय ही प्रगणना होते. पुढे वन परिक्षेत्र, विभाग नंतर राज्यस्तरावर माहिती गोळा करुन वन्यप्राणी, पशूल पक्ष्यांची आकडेवारी निश्चित केली जाते. मात्र, दोन वर्षांत प्रगणना झाली नसल्याने वन्यजीवांची संख्या नेमकी किती, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

-----------

कोरोना संसर्गामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रवेशास मनाई आहे. त्यामुळे यंदा जंगलात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना झाली नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वडाळी, पोहरा जंगलासाठी हीच नियमावली आहे.

- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी