शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भाकर गेली अन् नुडल्स आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.

ठळक मुद्देकवी विठ्ठल वाघ यांची मिश्कील टीका : मराठी भाषा दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, हेमंत खडके आदी उपस्थित होते.विठ्ठल वाघ म्हणाले, मराठी भाषेला इतिहास, गौरव आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले. परंतु, आता मराठी भाषेची भेसळ झाली. अलीकडे मराठी माणूस भाषेचे पोषाख परिधान करीत नाही. भाषा बोलत नाही. खानपान बदलले. मराठी भाषा बोलणे अपमानजनक वाटते. त्यामुळे संस्कृतीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरी वाढदिवस, उत्सवाचे प्रसंग असले की, आता भाकर मिळत नाही. नुडल्सने ती जागा घेतली. त्यामुळे संस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषा बोलली पाहिजे. माय आणि मम्मी यातील फरक समजून घ्या. मुंबई, पुण्याकडेच केव्हाचीच मराठी भाषा संपली. खेड्यातील माणूस निरक्षर, अशिक्षित असल्यामुळेच मराठी भाषा जिवंत असल्याचा दावा वाघ यांनी केला.‘माझ्या मायमराठीचा मला जिवापार छंद’, ‘बैलातील चैतन्याशी तिफण जोडते नाते’, ‘हिरवं लुगडं नेसली लाल बांगड्या हातात’, ‘पारंबी होजो लेका वडाले देजो टेका’ अशा सरस कवितांचे सादरीकरण करून त्यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ प्रादेशिक बोलींच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, संचालन हेमंत खडके यांनी केले.तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक परिधान करून मुलेमुली यामध्ये सहभागी झाली होती. ही दिंडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वाजतगाजत नेण्यात आली.