शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

भाकर गेली अन् नुडल्स आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.

ठळक मुद्देकवी विठ्ठल वाघ यांची मिश्कील टीका : मराठी भाषा दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, हेमंत खडके आदी उपस्थित होते.विठ्ठल वाघ म्हणाले, मराठी भाषेला इतिहास, गौरव आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले. परंतु, आता मराठी भाषेची भेसळ झाली. अलीकडे मराठी माणूस भाषेचे पोषाख परिधान करीत नाही. भाषा बोलत नाही. खानपान बदलले. मराठी भाषा बोलणे अपमानजनक वाटते. त्यामुळे संस्कृतीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरी वाढदिवस, उत्सवाचे प्रसंग असले की, आता भाकर मिळत नाही. नुडल्सने ती जागा घेतली. त्यामुळे संस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषा बोलली पाहिजे. माय आणि मम्मी यातील फरक समजून घ्या. मुंबई, पुण्याकडेच केव्हाचीच मराठी भाषा संपली. खेड्यातील माणूस निरक्षर, अशिक्षित असल्यामुळेच मराठी भाषा जिवंत असल्याचा दावा वाघ यांनी केला.‘माझ्या मायमराठीचा मला जिवापार छंद’, ‘बैलातील चैतन्याशी तिफण जोडते नाते’, ‘हिरवं लुगडं नेसली लाल बांगड्या हातात’, ‘पारंबी होजो लेका वडाले देजो टेका’ अशा सरस कवितांचे सादरीकरण करून त्यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ प्रादेशिक बोलींच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, संचालन हेमंत खडके यांनी केले.तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक परिधान करून मुलेमुली यामध्ये सहभागी झाली होती. ही दिंडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वाजतगाजत नेण्यात आली.