शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

भाकर गेली अन् नुडल्स आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.

ठळक मुद्देकवी विठ्ठल वाघ यांची मिश्कील टीका : मराठी भाषा दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, हेमंत खडके आदी उपस्थित होते.विठ्ठल वाघ म्हणाले, मराठी भाषेला इतिहास, गौरव आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले. परंतु, आता मराठी भाषेची भेसळ झाली. अलीकडे मराठी माणूस भाषेचे पोषाख परिधान करीत नाही. भाषा बोलत नाही. खानपान बदलले. मराठी भाषा बोलणे अपमानजनक वाटते. त्यामुळे संस्कृतीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरी वाढदिवस, उत्सवाचे प्रसंग असले की, आता भाकर मिळत नाही. नुडल्सने ती जागा घेतली. त्यामुळे संस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषा बोलली पाहिजे. माय आणि मम्मी यातील फरक समजून घ्या. मुंबई, पुण्याकडेच केव्हाचीच मराठी भाषा संपली. खेड्यातील माणूस निरक्षर, अशिक्षित असल्यामुळेच मराठी भाषा जिवंत असल्याचा दावा वाघ यांनी केला.‘माझ्या मायमराठीचा मला जिवापार छंद’, ‘बैलातील चैतन्याशी तिफण जोडते नाते’, ‘हिरवं लुगडं नेसली लाल बांगड्या हातात’, ‘पारंबी होजो लेका वडाले देजो टेका’ अशा सरस कवितांचे सादरीकरण करून त्यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ प्रादेशिक बोलींच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, संचालन हेमंत खडके यांनी केले.तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक परिधान करून मुलेमुली यामध्ये सहभागी झाली होती. ही दिंडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वाजतगाजत नेण्यात आली.