शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचासाठी चढाओढ; मात्र सदस्यसपद कुणालाच नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:45 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उमेदवार निवडीत नेत्यांच्या नाकीनऊ

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही राजकीय चिन्ह न वापरता ही निवडणूक लढविण्याचा फतवा देखील निघाल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे, तर दुसरीकडे सदस्यपदासाठी उमेदवार सापडेनासे झाल्याने नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.जिल्ह्यात २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राजयकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी चढाओढजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राकाँला चांगली लढत दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात भाजप-काँग्रेस-सेना व अन्य पक्षांना ताकद वाढवावी लागणार आहे.ग्रामीण भागातील मतदारांची मते स्वत:कडे सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसब पणाला लावत आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी सरपंचपद मिळविण्याची नवी खेळी खेळली जात आहे. परिणामी आरक्षणानुसार सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सरपंचपदासाठी कोणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सरपंचपदावर विराजमान व्यक्तीविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यानंतरदेखील अन्य सरपंचाची निवड जनतेतूनच करावी लागणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.छोट्या वस्त्यांमधील सदस्यांना मिळेल का संधी ?सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र, मतदानाची आकडेमोड लक्षात घेता गट ग्रामपंचायतीत समाविष्ट वाड्यांना सरपंचपद मिळण्याची आशा धुसर झाली आहे. सरपंचाच्या थेट निवडीमुळे गट ग्रामपंचायतींमध्ये पक्ष किंवा आघाड्यांद्वारे अधिक मतदारसंख्या असलेल्या गावांमधूनच सरपंचपदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. यापूर्वी सरपंचाची निवड प्रभागातील सदस्यांमधून केली जात असल्याने कोणत्याही प्रभागातील सदस्याला सरपंचपदाची संधी मिळत असे. निवडणूक झाल्यानंतर तडजोडीच्या राजकारणातून किंवा आघाडीच्या समझोत्याप्रमाणे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपद दिले जात होते. मात्र, थेट सरपंचनिवडीमुळे एकूणच समीकरणे बदलली आहेत. गट ग्रामपंचायतींमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक वाड्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असतो. आता सरपंचाच्या थेट निवडीमुळे या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना कितपत संधी मिळेल, हे निवडणुकीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. गटातटाच्या राजकारणाला या निवडणुकीत अधिक रंगत येईल, हे मात्र खरे.