शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचासाठी चढाओढ; मात्र सदस्यसपद कुणालाच नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:45 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उमेदवार निवडीत नेत्यांच्या नाकीनऊ

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही राजकीय चिन्ह न वापरता ही निवडणूक लढविण्याचा फतवा देखील निघाल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे, तर दुसरीकडे सदस्यपदासाठी उमेदवार सापडेनासे झाल्याने नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.जिल्ह्यात २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राजयकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी चढाओढजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राकाँला चांगली लढत दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात भाजप-काँग्रेस-सेना व अन्य पक्षांना ताकद वाढवावी लागणार आहे.ग्रामीण भागातील मतदारांची मते स्वत:कडे सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसब पणाला लावत आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी सरपंचपद मिळविण्याची नवी खेळी खेळली जात आहे. परिणामी आरक्षणानुसार सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सरपंचपदासाठी कोणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सरपंचपदावर विराजमान व्यक्तीविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यानंतरदेखील अन्य सरपंचाची निवड जनतेतूनच करावी लागणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.छोट्या वस्त्यांमधील सदस्यांना मिळेल का संधी ?सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र, मतदानाची आकडेमोड लक्षात घेता गट ग्रामपंचायतीत समाविष्ट वाड्यांना सरपंचपद मिळण्याची आशा धुसर झाली आहे. सरपंचाच्या थेट निवडीमुळे गट ग्रामपंचायतींमध्ये पक्ष किंवा आघाड्यांद्वारे अधिक मतदारसंख्या असलेल्या गावांमधूनच सरपंचपदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. यापूर्वी सरपंचाची निवड प्रभागातील सदस्यांमधून केली जात असल्याने कोणत्याही प्रभागातील सदस्याला सरपंचपदाची संधी मिळत असे. निवडणूक झाल्यानंतर तडजोडीच्या राजकारणातून किंवा आघाडीच्या समझोत्याप्रमाणे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपद दिले जात होते. मात्र, थेट सरपंचनिवडीमुळे एकूणच समीकरणे बदलली आहेत. गट ग्रामपंचायतींमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक वाड्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असतो. आता सरपंचाच्या थेट निवडीमुळे या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना कितपत संधी मिळेल, हे निवडणुकीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. गटातटाच्या राजकारणाला या निवडणुकीत अधिक रंगत येईल, हे मात्र खरे.