शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भारत कृषक समाज परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 00:18 IST

भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या...

जयपूर येथे परिषद : वसंत लुंगे यांची पत्रपरिषदेत माहितीअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज राष्ट्रीय गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सदस्य परिषद ही जयपूर येथे २ व ३ आॅक्टोबरला होत आहे. या परिषदेत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर मंथन करून ते सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती बुधवारी पत्रपरिषदेत भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांनी दिली.देशभरात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारत कृषक समाज विविध आघाड्यांवर काम करीत आहे व जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत विदर्भातून मोठ्या संख्येने शेतकरी सामील होतील, असे वसंत लुंगे यांनी सांगितले. विशेषत: या परिषदेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत २५ टक्के आरक्षण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घेणे तसेच शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करावा, पेरेपत्रकानुसार पीकविमा पद्धतीत सुधारणा, ‘नीट’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या पाल्यांकरिता २५ टक्के जागा आरक्षित करणे आदी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत समस्यांवर मंथन होऊन ठराव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे लुंगे यांनी सांगितले. या परिषदेला देशभरातील भारत कृषक समाजाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला शशांक देशमुख, दीपक लोखंडे, आशुतोष गुल्हाने, किशोर गुल्हाने, जगदिश कुचे, राजू निंभोरकर, मंगेश जुनधरे, विशाल अढाऊ, राजेंद्र निर्मळ, राजेश मरोडकर आदीे उपस्थित होते. (प्रतिनिधी)