शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

भारत कृषक समाज परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 00:18 IST

भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या...

जयपूर येथे परिषद : वसंत लुंगे यांची पत्रपरिषदेत माहितीअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज राष्ट्रीय गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सदस्य परिषद ही जयपूर येथे २ व ३ आॅक्टोबरला होत आहे. या परिषदेत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर मंथन करून ते सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती बुधवारी पत्रपरिषदेत भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांनी दिली.देशभरात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारत कृषक समाज विविध आघाड्यांवर काम करीत आहे व जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत विदर्भातून मोठ्या संख्येने शेतकरी सामील होतील, असे वसंत लुंगे यांनी सांगितले. विशेषत: या परिषदेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत २५ टक्के आरक्षण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घेणे तसेच शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करावा, पेरेपत्रकानुसार पीकविमा पद्धतीत सुधारणा, ‘नीट’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या पाल्यांकरिता २५ टक्के जागा आरक्षित करणे आदी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत समस्यांवर मंथन होऊन ठराव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे लुंगे यांनी सांगितले. या परिषदेला देशभरातील भारत कृषक समाजाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला शशांक देशमुख, दीपक लोखंडे, आशुतोष गुल्हाने, किशोर गुल्हाने, जगदिश कुचे, राजू निंभोरकर, मंगेश जुनधरे, विशाल अढाऊ, राजेंद्र निर्मळ, राजेश मरोडकर आदीे उपस्थित होते. (प्रतिनिधी)