शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बेशुद्धावस्थेत सापडलेला बालक निघाला बल्लारशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:18 IST

चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले.

ठळक मुद्देचांदूर रेल्वेतील घटना : ओळख पटली, आयूष रोहिदासला मिळाले आई-वडील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले. आयुष अनिल रोहिदास (४, रा. बल्लारशा) असे त्या बालकाचे नाव आहे.चांदूर रेल्वे येथील रेल्वे स्थानकावर आढळून आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला जीआरपी पोलिसांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख यांनीही विविध स्तरावर प्रयत्न केले. दरम्यान, एका कुटुंबीयांनी बल्लारशा पोलिसांकडे बालक बेपत्ता असल्यासंदर्भात धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबीयांना जखमी बालकाचे छायाचित्र दाखविताच ओळख पटली. ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ अमरावतीकडे धाव घेतली. दोन दिवसांनंतर कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल असलेला आयुष दिसताच त्यांचे अश्रू अनावर झाले. तथापि, पोलिसांनी आयुष रेल्वे स्थानकावर कसा पडला, याबाबत माहिती विचारली असता, त्याचा घटनाक्रम न पटण्यासारखाच होता. आयुषचे मोठे वडील अशोक रोहिदास १ मे रोजी आयुष व त्यांचा मुलगा आझादला फिरायला घेऊन गेले. त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर पोहोचले. डोंगरगड जाण्याचा बेत आखून ते बम्बलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांना तेथून बल्लारशाला परत यायचे होते, मात्र, रेल्वे गाडी नसल्यामुळे ते स्थानकावरच झोपले. २ मे रोजी अशोक हे दोन्ही मुलांना घेऊन एका रेल्वेत बसले. चांदूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे त्यांना समजले. ते रेल्वेतून आली उतरले आणि बल्लारशा रेल्वेची प्रतीक्षा करू लागले. काही तासानंतर बल्लारशा जाणारी रेल्वे आली. अशोक रोहिदास दोन्ही मुलांना घेऊन चढत असताना आयुष खाली पडला आणि रेल्वे पुढे निघून गेली. अशोक एका पायाने अंपग असल्यामुळे रेल्वेतून उतरून आयुषला उचलणे त्यांना शक्य झाले नाही. ही बाब जीआरपी पोलिसांच्या चौकशीत पुढे आली.मुलाची छायाचित्रे व्हाटसअ‍ॅपद्वारे सगळीकडे पाठविण्यात आली होती. त्या मुलाची बल्लारशा येथील आयुष रोहिदास अशी ओळख पटली. त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.- राजेंद्र नागरे, पोलीस उपनिरीक्षक, जीआरपी.