शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जलसंपदा विभागाच्या परिसरात दारुच्या खाली बॉटलांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयानजीक तसेच उर्ध्व वर्धा कर्मचाऱ्यांच्या वसाहत परिसरात मद्यपि रात्री दरम्यान येथेच्छ दारु ढोसतात. त्यामुळे दारुच्या खाली ...

येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयानजीक तसेच उर्ध्व वर्धा कर्मचाऱ्यांच्या वसाहत परिसरात मद्यपि रात्री दरम्यान येथेच्छ दारु ढोसतात. त्यामुळे दारुच्या खाली बॉटल परिसरातील सिंचन विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीजवळ फेकून देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसरात फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी दारुच्या रिकाम्या बॉटलचा खच तसेच खाली डिस्पोजेबल ग्लास आढळून आले.

या परिसरात बाहेरील टवाळखोरांचा सुद्धा शिरकाव होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील वसाहतमध्ये राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आली आहे. त्यामुळे परिसरात रात्री दरम्यान सुरक्षा रक्षक नेमले पाहिजे तसेच परिसरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे सुद्धा लावण्याची मागणी होत आहे.

उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंताच्या ईमारतीच्या मागील बाजुला शौचालयाजवळ काही दारुच्या बॉटल्स फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तसेच अधिक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी दक्षता पथक अमरावती परीमंडळ कार्यालयाच्या ईमारतीच्या मागे दारुच्या बॉटल्स आढळून आल्या. तसेच परिसरात अनेक नाल्यांमध्ये तसेच परिसरात अनेक ठिकाणी दारुच्या बॉटल्स मिळून आल्या. याचा अर्थ की या ठिकाणी अंधाराचा फायदा घेवून मद्यपी ओल्या पार्ट्या झोडतात. त्यानंतर दारुच्या रिकाम्या बॉटल्स येथेच फेकून देतात. त्यामुळे यावर नियंत्रण कुणाचे याच परिसरात, दोन्ही मुख्य अभियंता, दोन्ही अधिक्षक अभियंता तसेच तीन कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहेत. तसेच सबडिव्हीजन सुद्धा आहे. तसेच अधिक्षक अभियंत्याच्या दालनाजवळ जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांचे जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे. त्यामुळे रात्रकालीन परिसरात अनेक सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे असताना बोटावर मोजण्याईतकेच सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे बाहेरील लोकांचा वावर वाढला आहे. तसेच काही कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दारु ढोसत असल्याची माहिती आहे.

कोट आहे.