शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:10 IST

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार ...

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार येथील शेतकरी गणेश आसोडे यांच्या शेतातून त्यांचा मुलगा नीलेश हा भाजीपाला आणत होता. भाजीपाला धुण्यासाठी तो कालव्यात उतरला. त्याच्या मागेच वडील उभे होते. दरम्यान, पाय घसरून पडल्याने तो बारा फूट खोल कालव्यात पडला. त्याला वाचविण्याचे वडिलांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. पोहता येत नसल्याने व कालव्याचे पाणी वाहते असल्याने तो तग धरू शकला नाही व यातच त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर नीलेशचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू होती. वडिलांदेखत तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरी घटना मोर्शी तालुक्यात रविवारी घडली. येथील गिट्टी खदान परिसरात राहणारा राजू विठ्ठल बोरावार धरणातून निघणाºया कालव्यातून मासेमारी करून परत येत असताना शौचास गेला. कालव्यात उतरत असताना त्याचा पाय घसरल्याने तो वेगवान प्रवाहात सापडला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा मृतहेद घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. ज्या ठिकाणी तो बुडाला, ते ठिकाण धरणापासून केवळ ५० फूट अंतरावर आहे. येथे कालव्याची खोली अंदाजे १५ फूट आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोेड करीत आहेत. उजवा कालवा मोर्शी, तिवसा धामणगाव व वर्धा जिल्ह्यातील पुलगावपासून पुढे जातो.

टॅग्स :Amravatiअमरावती