शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विहिरीत दोघांचा गुदमरून मृत्यू

By admin | Updated: June 1, 2016 00:39 IST

गाळ उपसण्याकरिता विहिरीत उतरलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला.

मसानगंज येथील घटना : अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण अमरावती : गाळ उपसण्याकरिता विहिरीत उतरलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मसानगंज येथील सार्वजनिक विहिरीत घडली. प्रवीण भारत आठवले (३५) व बाबूलाल अभिमान वानखडे (३७, दोन्ही राहणार शेलू, ता.नांदगाव खंडेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण करण्यात आले. अथक परिश्रमानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.पावसाळ्यापूर्वी शहरातील सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहे. शहरातील काही विहिरींमधील गाळ उपसण्याचे कंत्राट गजानन किसन रोतळे (४०, रा. कुंभारवाडा) यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत प्रवीण आठवले, बाबूलाल वानखडे, सुरेश शंकर घुले व संदीप प्रल्हाद सावंत हे देखील काम करीत होते. मंगळवारी कंत्राटदार गजानन रोतळे व कामगारांनी सकाळी ९ वाजता गवळीपुऱ्यातील विहिरीची साफसफाई केली. त्यानंतर ते मसानगंज परिसरातील साहू मंगल कार्यालयानजीकच्या सार्वजनिक विहिरीचा उपसा करण्याकरीता गेले. त्यांनी सकाळी १० वाजता विहिरीतील कचरा स्वच्छ करण्याचे काम सुरु केले होते. सर्वप्रथम प्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघे विहिरीतील कचरा काढण्याकरिता आत उतरले होते तर गजानन रोतळे व सुरेश घुले आणि संदीप सावंत बाहेर कचरा गोळा करण्यासाठी उभे होते. सर्वांनी अर्धातास विहिरीतील गाळ काढला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा गाळ काढण्यास सुरूवात केली. मात्र, गाळ काढता-काढता अचानक प्रवीण आठवलेचा श्वास गुदमरू लागला. त्याने अन्य साथीदारांना मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर तोे बेशुध्द होऊन विहिरीतील घाण पाण्यात कोसळला. हे लक्षात येताच बाबूलाल वानखडेने प्रवीणला वाचविण्याचा प्रयत्न केला. तो देखील विहिरीच्या पाण्यात उतरला.विषारी गॅसमुळे मृत्यूअनेक वर्षांपासून या विहिरीतील पाण्याचा उपसा बंद होता. त्यात परिसरातील नागरिक कचरा, निर्माल्य व गणपती शिरवीत होते. यामुळे विहिरीत विषारी गॅस तयार झाला असावा. त्या गॅसमुळेच कामगारांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची चर्चा होती. विहिरीचे पाणी बऱ्याच दिवसांपासून वापरात नव्हते. त्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होेती. मृत इसम सख्खे मावसभाऊप्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघेही सख्खे मावसभाऊ असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू गावात राहतात. दोघांनाही प्रत्येकी दोन मुले असून सद्यस्थितीत ती मुले शिक्षण घेत आहेत. उन्हाळ्यात कामाच्या शोधात असताना त्यांनी विहिरीतील गाळाचा उपसा करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, याच कामात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाचा कर्मचारी बेशुद्धअग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. अग्निशमन दलाचा कर्मचारी सुरेश पालवे (२२) याच्या कंबरेला दोरी बांधून विहिरीत पाठविण्यात आले. सुरेश पालवे विहिरीत अडकलेल्या एका कामगाराला दोरी बांधून बाहेर काढणार होता. मात्र,तेवढ्या वेळात तो देखील बेशुध्द झाला. ही बाब लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ बाहेर खेचले.