शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत दोघांचा गुदमरून मृत्यू

By admin | Updated: June 1, 2016 00:39 IST

गाळ उपसण्याकरिता विहिरीत उतरलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला.

मसानगंज येथील घटना : अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण अमरावती : गाळ उपसण्याकरिता विहिरीत उतरलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मसानगंज येथील सार्वजनिक विहिरीत घडली. प्रवीण भारत आठवले (३५) व बाबूलाल अभिमान वानखडे (३७, दोन्ही राहणार शेलू, ता.नांदगाव खंडेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलिसांना पाचारण करण्यात आले. अथक परिश्रमानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.पावसाळ्यापूर्वी शहरातील सार्वजनिक विहिरींच्या साफसफाईचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहे. शहरातील काही विहिरींमधील गाळ उपसण्याचे कंत्राट गजानन किसन रोतळे (४०, रा. कुंभारवाडा) यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत प्रवीण आठवले, बाबूलाल वानखडे, सुरेश शंकर घुले व संदीप प्रल्हाद सावंत हे देखील काम करीत होते. मंगळवारी कंत्राटदार गजानन रोतळे व कामगारांनी सकाळी ९ वाजता गवळीपुऱ्यातील विहिरीची साफसफाई केली. त्यानंतर ते मसानगंज परिसरातील साहू मंगल कार्यालयानजीकच्या सार्वजनिक विहिरीचा उपसा करण्याकरीता गेले. त्यांनी सकाळी १० वाजता विहिरीतील कचरा स्वच्छ करण्याचे काम सुरु केले होते. सर्वप्रथम प्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघे विहिरीतील कचरा काढण्याकरिता आत उतरले होते तर गजानन रोतळे व सुरेश घुले आणि संदीप सावंत बाहेर कचरा गोळा करण्यासाठी उभे होते. सर्वांनी अर्धातास विहिरीतील गाळ काढला. त्यानंतर थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा गाळ काढण्यास सुरूवात केली. मात्र, गाळ काढता-काढता अचानक प्रवीण आठवलेचा श्वास गुदमरू लागला. त्याने अन्य साथीदारांना मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर तोे बेशुध्द होऊन विहिरीतील घाण पाण्यात कोसळला. हे लक्षात येताच बाबूलाल वानखडेने प्रवीणला वाचविण्याचा प्रयत्न केला. तो देखील विहिरीच्या पाण्यात उतरला.विषारी गॅसमुळे मृत्यूअनेक वर्षांपासून या विहिरीतील पाण्याचा उपसा बंद होता. त्यात परिसरातील नागरिक कचरा, निर्माल्य व गणपती शिरवीत होते. यामुळे विहिरीत विषारी गॅस तयार झाला असावा. त्या गॅसमुळेच कामगारांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची चर्चा होती. विहिरीचे पाणी बऱ्याच दिवसांपासून वापरात नव्हते. त्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होेती. मृत इसम सख्खे मावसभाऊप्रवीण आठवले व बाबूलाल वानखडे हे दोघेही सख्खे मावसभाऊ असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू गावात राहतात. दोघांनाही प्रत्येकी दोन मुले असून सद्यस्थितीत ती मुले शिक्षण घेत आहेत. उन्हाळ्यात कामाच्या शोधात असताना त्यांनी विहिरीतील गाळाचा उपसा करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, याच कामात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाचा कर्मचारी बेशुद्धअग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. अग्निशमन दलाचा कर्मचारी सुरेश पालवे (२२) याच्या कंबरेला दोरी बांधून विहिरीत पाठविण्यात आले. सुरेश पालवे विहिरीत अडकलेल्या एका कामगाराला दोरी बांधून बाहेर काढणार होता. मात्र,तेवढ्या वेळात तो देखील बेशुध्द झाला. ही बाब लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ बाहेर खेचले.