शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

बँकांकडून वसुलीच्या तगाद्यामुळे कर्जदार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:54 IST

मार्च एंडिंगचे तुणतुणे वाजवत बँका वसुलीचा तगादा लावत आहेत. यावर्षी आर्थिक व्यवहार विस्कटल्याने कर्जदार शेतकरी, व्यावसायिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देमार्च एंडिंग : अधिकाऱ्यांना आवरा : शेतकऱ्यांसह व्यावसायिक हवालदिल

आॅनलाईन लोकमतवरूड : मार्च एंडिंगचे तुणतुणे वाजवत बँका वसुलीचा तगादा लावत आहेत. यावर्षी आर्थिक व्यवहार विस्कटल्याने कर्जदार शेतकरी, व्यावसायिक त्रस्त आहेत. तरीही पोलीस आणि जप्तीच्या धमक्या देऊन बँक अधिकाऱ्यांनी वसुलीचा सपाटाच लावला आहे. प्रशासनाने यावर शिथिलता आणावी, अशी मागणी कर्जदार करीत आहेत.वरूड तालुक्यात कर्ज वसुलीसाठी गहाण मालमत्ता, घरातील साहित्य जप्तीच्या धमक्या देऊन कर्जवसुलीचे प्रयत्न बँक अधिकाऱ्यांनी चालविले आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याची चर्चा आहे. एकीकडे शेतातील उत्पादनाने दगा दिला. निघालेल्या शेतमालाला भाव नाही. निसर्गाची साथ नाही. दुसरीकडे कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न आहे. याकरिता एकही लोकप्रतिनिधी वा अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे या अधिकाºयांना आवर घालणार तरी कोण, हा प्रश्न कर्जदारांना सतावत आहे.अवसायनातील संस्थांच्या ठेवीची जबाबदारी कुणाची?अनेक पतसंस्था, सहकारी बँका, बाहेरच्या सहकारी पतपुरवठा संस्थांमध्ये नागरिकांनी विश्वासाने लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या. कुणी पै-पै जमा केलेली राशी बँकांमध्ये संचयित केली. मात्र, यातील काही बँका, पतसंस्था अवसायनात निघाल्याने कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले, याची जबाबदारी सरकार का घेत नाही? सदर पतपुरवठा संस्थांना परवानगी शासनाने दिलेली आहे, तर खातेदारांच्या ठेवीची जबाबदारी का घेत नाही, असा सवालसुद्धा नागरिकांतून केला जात आहे.शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूकछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या निकषात ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, अशा शेतकऱ्यांपुढे कर्जाचा भरणा करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बँक अधिकारी त्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.