शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कर्जदार शेतकरी केंद्राच्या सवलतीला मुकणार

By admin | Updated: April 17, 2017 00:16 IST

कर्जमाफीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सेवा सोसायट्यांवर बँकांच्या पीक कर्जाची ३१ मार्चअखेर परतफेड केलेली नाही.

कर्जमाफीकडे डोळे : ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याचा फटकाजितेंद्र दखणे अमरावतीकर्जमाफीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी सेवा सोसायट्यांवर बँकांच्या पीक कर्जाची ३१ मार्चअखेर परतफेड केलेली नाही. १ एप्रिल २०१६ नंतर घेतलेले परंतु ३१ मार्च २०१७ पर्यंत फेडलेले एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने होते, तर एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज एक टक्का व्याजाने होते. हे कर्ज परतफेड न केलेले शेतकरी केंद्राच्या व्याज सवलतीलाही मुकले आहेत. आता ३० जूनपर्यंत या शेतकऱ्यांनी कर्जपरतफेड केली, तर त्यांना राज्य शासनाच्या तीन टक्के व्याजमाफीचा फायदा मिळणार आहे.सोसायट्या व बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या जास्तीत जास्त एक लाखापर्यंतच्या कर्जाला केंद्र शासन तीन टक्के तर राज्य शासन तीन टक्के व्याज सवलत देते. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळतो. दरम्यान एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जावर केंद्र सरकार तीन टक्के तर राज्य शासन एक टक्का व्याज सवलत देते. त्यासाठी शेतकऱ्यांनी एप्रिलनंतर पीक कर्ज काढून मार्चअखेरपर्यंत त्यांची परतफेड करणे गरजेचे होते. मार्चअखेरपर्यंत कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळत नाही. पुढे जूनपर्यंत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळतो. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल, या आशेने ३१ मार्चअखेर कर्ज परतफेड केलेली नाही. त्यामुळे सोसायट्याच्या व बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झाला आहे. आता या शेतकऱ्यांनी जून २०१७ अखेर कर्ज परतफेड केली नाही तर ही पीककर्जे थकबाकीत जातील. कर्जमाफी झाली नाही, तर थकबाकीदार शेतकऱ्यांना १०.५० टक्के व्याज आणि दंड व्याज असा भुर्दंड बसणार आहे. शेतकरी दरवर्षी थकबाकी नको म्हणून ३१ मार्चपूर्वी कशीतरी कर्ज परतफेड करतात. काही शेतकरी उसनवार किंवा व्याजाने पैसे घेऊन भरतात आणि कर्ज जुन्याचे नवे करून घेतात. परंतु यावर्षी कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत कर्ज परतफेड केली नाही. (प्रतिनिधी)