शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ सुविधेसह मूलभूत सुविधांचा बूस्टर! निम्न पेढी प्रकल्प

By प्रदीप भाकरे | Updated: February 26, 2024 21:56 IST

पाच पुनर्वसित गावात बाजार ओटे अन् अंगणवाडी बांधकाम

प्रदीप भाकरे, अमरावती: भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पबाधितांची पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्णत: बुडीत पाचही गावातील लोक हळूहळू मूळ गाव सोडून पुनर्वसन स्थळी येऊ लागले आहेत. त्याअनुषंगाने प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच पाचही पुनर्वसित गावात बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशान शेडसाठी संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत.

निंभास्थित पेढी नदीवर निम्न पेढी सिंचन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, अळणगाव, हातुर्णा व गोपगव्हान ही पाच गावे पूर्णता बाधित झाली आहेत. त्यामुळे त्या पाचही गावांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पाचे बांधकाम ९० टक्क्यांवर थांबल्याने व अद्यापही घळभरणी न झाल्याने बाधित कुटुंबांची पुनर्वसनस्थळी घरे बांधण्यास मर्यादा आली आहे. मात्र ते यावेत, यासाठी आता सुमारे तीन कोटींमधून पाचही पुनर्वसित क्षेत्रात बाजार ओटे व अन्य सुविधा साकारल्या जाणार आहेत.

बाजार ओटा अन् स्मशानशेडला आवारभिंतहातुर्णा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन मौजा रायपूर पांढरी येथे झाले आहे. तेथे ७३.३१ लाख रुपये खर्चून सिमांकन नाली व रस्ता ओलांडण्याकरिता स्लॅबचे बांधकाम सुरू होणार आहे. तेथेच ४१.९८ लाख रुपये खर्चून स्मशान शेडसाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे, तर २७.८५ लाख रुपये खर्चून पांढरी रायपूर या पुनर्वसन स्थळी २७.८५ लाख रुपये बाजार ओटा बांधला जाणार आहे. गोपगव्हान येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन लोणटेक येथे करण्यात आले. तेथे ३६.५९ लाख रुपये खर्चून संरक्षणभिंत व १५.९१ लाख रुपयांतून बाजार ओटा साकारला जाईल.///////कुंड खुर्द, सर्जापूर, अळणगावातही बांधकामकुंडखुर्द (कठोरा) येथे ३१.५७ लाखांतून स्मशानशेडसाठी संरक्षण भिंत, तर २६.६० लाख रुपयांतून अंगणवाडी इमारत, तर १९.८७ लाख रुपयांमधून बाजार ओट्याचे बांधकाम होईल. कुंडसर्जापूर येथे २०.६६ लाखांतून, तर अळणगावकरांसाठी पुनर्वसित कठोरा येथे २७.८३ लाख रुपये खर्चून बाजार ओटा साकारला जाणार आहे.////कुणाचे पुनर्वसन कोठे?मूळ गाव : पुनर्वसन ठिकाणअळणगाव : कठोराकुंड खुर्द : कठोरागोपगव्हान : लोणटेककुंड सर्जापूर : कुंड सर्जापूर रोडहातुर्णा : पांढरी रायपूर////////कोटनिम्न पेढी प्रकल्पातील प्रकल्पबाधित कुटुंब पुनर्वसन स्थळी घरे बांधू लागली आहेत. पुनर्वसन ठिकाणी ३ कोटी रुपयांतून बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशानशेडला संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत.गणेश कथले, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग

टॅग्स :Amravatiअमरावती