शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कोल्हापुरी बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: October 27, 2015 00:20 IST

लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले.

हरित क्रांती : शेतकरी, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहनमोर्शी : लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली. दुसरीकडे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाट्या चोरीला जाऊ नये, यासाठी नागरिकांनी आणि विशेषत: शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता अभिमन्यू वडेर यांनी केले. मूळचे कोल्हापूर येथील राहणारे उपविभागीय अभियंता वडेर यांना कोल्हापुरी बंधाऱ्याच्या व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. वरुड येथे झालेल्या कृषी मेळाव्यात आमदार बोंडे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थिती पाहता यावर्षी लवकर पाणी अडविण्याची आवश्यकता विशद केली होती. हे पाहता उपविभागीय अभियंता वडेर यांनी वरुड तालुक्यातील आमनेर, मोर्शी तालुक्यातील पाळा, उदखेड, खेड येथील विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यासोबतच पाळा व सालबर्डी येथील पाणी वापर संस्थांना हस्तांतरित केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याची योजना शाखा अभियंता नितीन ठाकरे व प्रदीप देशामुख यांच्या सहकार्याने कार्यान्वित केली. पाणी वापर संस्थांच्या बैठकी घेऊन त्यांना तातडीने पाणी अडविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी पाट्या टाकण्यात आल्याने सध्या या सर्वच बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी थांबविले गेले आहे. (तालुका प्रतिनिधी)पाट्यांचे संरक्षण करण्याच्या सूचना ! कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाट्या बांधासमोरील शेतकरी, वाळूमाफिया काढून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या लोखंडी पाट्या चोरटे चोरुन नेण्याचीही भीती आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कोल्हापुरी बांधाच्या या पाट्यांचे संरक्षण करण्याचे आणि त्याकरिता गावातील सरपंच यांच्या मदतीने सुकाणू समिती नेमून बंधाऱ्याच्या संरक्षणाकरिता गस्ती पथक निर्माण करण्याची सूचनाही यावेळी उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे. सिंचनाची सोय झालीबंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले गेल्यामुळे आमनेर बंधाऱ्यातून ९६ हेक्टर, खेड बंधाऱ्यातून २७ हेक्टर, पाळा-१ बंधाऱ्यातून ८६ हेक्टर, उदखेड बंधाऱ्यातून १७ हेक्टर, सालबर्डी बंधाऱ्यातून ५१ हेक्टर आणि पाळा-२ कोल्हापूरी बंधाऱ्यातून ९० हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. या सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता अभिमन्यू वडेर यांनी केले आहे.