मोहन राऊत - अमरावती दरवर्षी सोयाबीन पेरणीची तीच पारंपरिक पद्धत, उत्पादनात होणारी घट अशा विविध कारणांमुळे कृषी विभागाने ५0 टक्के अनुदानावर यंदा बीबीएफ यंत्राचे जिल्ह्यातील तब्बल १३१ बचत गटांना वाटप केले आहे. त्यामुळे २८ हजार हेक्टरमध्ये या यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे. सोयाबीन बियाण्यांची टंचाई व आगामी काळात कमी झालेला पाऊस यावर उपायकारक असे हे यंत्र विकसित झाले आहे. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकी पध्दतीने शेती करण्यावर अधिक भर देत आहे. कृषी विभागाच्यावतीने यंदा विदर्भ प्रवाही सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १३१ बचत गटांना बीबीएफ म्हणजे रूंदसरी वरंबा यंत्र अनुदानावर देण्यात आले आहे. या यंत्राद्वारे पेरणी केल्यास २0 टक्के बियाण्यांची बचत होऊन उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वर्तविला आहे. जूनच्या तिसर्या व चौथ्या आठवड्यात ७५ ते १00 मिमी पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणी रूंदसरी वरंबा पध्दतीने केल्यास बियाण्यांची बचत होते. सोयाबीन, तूर, ज्वारी या धान्याची पेरणी अधिक सुलभ पध्दतीने करता येते. बाजारात या यंत्राची किंमत ४७ हजार रुपये असून कृषी विभागाने एक वर्षात जिल्ह्यातील ४0 शेतकर्यांचा प्रत्येकी एका बचत गटाला ५0 टक्के अनुदानावर हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. आतापासून शेतकर्यांनी या यंत्राला पसंती दाखविली आहे.
बीबीएफ यंत्र ठरणार शेतकर्यांना वरदान
By admin | Updated: May 24, 2014 23:14 IST