शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी बियाणे, चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:39 IST

खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बी.टी बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा भंडाफोड सोमवारी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी केला. मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे बोंडअळी, बुरसीजन्य रोगामुळे कपाशी पिकांच्या नुकसानाचा शेतकऱ्यांना फटका बसला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आमसभेत गाजला मुद्दा, पाच सदस्यीय समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बी.टी बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा भंडाफोड सोमवारी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी केला. मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे बोंडअळी, बुरसीजन्य रोगामुळे कपाशी पिकांच्या नुकसानाचा शेतकऱ्यांना फटका बसला. यंदा तर खरीप हंगाम सुरू होताच जिल्हाभरात शासनाने मान्यता दिलेल्या बी.टी.बियाण्यांशिवाय राजा व जादूगर नावाच्या कंपनीचे जिल्हाभरात १ लाख १३ हजार पाकिटे आले कसे, असा प्रश्न बियाण्यांचे पुरावे देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी जिल्हा परिषदेच्या आमसभेत कृषी अधिकाºयांना केला. खरीप हंगामात बोगस बी- बियाणे व खताचा काळाबाजार रोखण्यासाठी एकीकडे भरारी पथके गठित केल्याचे मोठया अभिमानाने कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. जिल्ह्यात बोगस बियाणे आले असताना हे बियाणे कृषी विभागाच्या अधिकाºयांना का दिसत नाही. यावरून बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीला या विभागाचे अभय तर नाही ना, असा संशय या प्रकारामुळे बळावल्याचा आरोप भुयार यांनी केला. भुयार यांच्या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता झेडपी अध्यक्ष यांनी बोगस बी.टी. बियाण्यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आमसभेत एकमताने घेण्यात आला. याला सत्ताधारी व विरोधीपक्षाच्या सदस्यांनीही समर्थन दिले. या चौकशी समितीचे प्रमुख हे स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष असून यामध्ये दोन सदस्य व दोन अधिकारी अशी पाच जणांचा समावेश आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सभागृहात दिले. यावेळी आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा आदी विभागाच्या मुद्यावरही वादळी चर्चा झाली. सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, प्रताप अभ्यंकर, महेंद्रसिंग गैलवार, प्रवीण तायडे, शरद मोहोड, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, राधिका घुईखेकर, प्रकाश साबळे, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अ‍ॅडिशनल सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, पतंगराव, प्रशांत थोरात, संजय इंगळे, माया वानखडे, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे, संजय येवले, कॅफो रवींद्र येवले, विजय रहाटे व खातेप्रमुख तसेच सदस्य उपस्थित होते.समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या विरोधात ठरावजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी मीणा अंबाडेकर यांच्या कार्यप्रणालीवर ११ जून रोजी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला. सदस्यांनी विचारलेली माहिती समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे गटनेता प्रवीण तायडे, सदस्य शरद मोहोड यांनी सभेत प्रश्न मांडला. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचा ठराव मांडला व हा प्रस्ताव अध्यक्षांनी मान्य केला.खड्डे बुजविण्यासाठी ५० हजारांचा निधीजिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्कलमध्ये रस्त्याची वाट अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी प्रत्येक सदस्याला प्रत्येकी २ लाख रूपये रस्ते व खड्डे दुरूस्तीसाठी देण्याची मागणी सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी केली. यावर बबलू देशमुख यांनी याला सहमती दर्शविली. दरम्यान पावसाचे दिवस लक्षात घेता या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक सदस्यांना सर्कलमध्ये खड्डे बुजविण्यासाठी ५० हजार रूपये देण्याचा ठराव अध्यक्षांनी मान्य केला.बोगस बीटी बियाणे बाजारपेठेत आल्याचे पुरावे सदस्यांनी सभागृहात मांडले. याची दखल घेतली. यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. यात जे दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल व याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद