शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रानडुकरांनी उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पºहाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. तीन एकरात अवघे साडेतीन क्विंटल सोयाबीन त्यांना घरी नेता आले. हे नुकसान कपाशीतून भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच रानडुकरांनी पिकांमध्ये शिरून उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देकपाशी उखडली। सोयाबीनच्या नापिकीनंतर शेतकऱ्यांना आणखी एक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : सोयाबीनच्या अत्यल्प उत्पादनाचे शल्य मनात ठेवून शेतकरी ज्या पिकाकडे अपेक्षेने पाहत होता, त्या कपाशीवर घाला घालत उरल्यासुरल्या अपेक्षाही रानडुकरांनी घालविल्या आहेत. रानडुकरे सौर कुंपणाला जुमानत नाहीत. ठार करण्याची परवानगी नाही. यामुळे फूल-बोंडांनी लदबदलेली कपाशी आडवी होताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे इलाज नाही. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील शेतकऱ्यांची ही समस्या आजूबाजूच्या परिसरातही डोके वर काढत आहे.सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पऱ्हाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. तीन एकरात अवघे साडेतीन क्विंटल सोयाबीन त्यांना घरी नेता आले. हे नुकसान कपाशीतून भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच रानडुकरांनी पिकांमध्ये शिरून उच्छाद मांडला आहे. जमिनीपासून वीत-दीड वीत ठेवून पुढील अख्खे झाड झोपविण्याचे कसब असलेल्या रानडुकरांनी उभे पीक आडवे केले. कपाशीच्या शेतात सीतादहीच झाली नाही. एकही वेचा घरी आला नाही. लागवडीचा खर्च निघाला नसल्याने भरपाईची मागणी अशोक बोरोडे, नरेंद्र शेळके, पुरुषोत्तम बोरोडे व परिसरातील शेतकºयांनी केली. त्यांना रानडुकरांमुळे नापिकीचा सामना करावा लागत आहे.वनमंत्र्यांकडे मागणार दादरानडुकरांनी पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार व वनविभागाला करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय राज्याच्या वनमंत्र्यांकडे नुकसानभरपाईची फिर्याद देणार असल्याचेही शेतकरी म्हणाले.दिवसाही भीतीशेताचा कोपरानकोपरा माहिती असणाºया शेतकऱ्यांना आता दिवसाची रानडुकरांमुळे जिवाची भीती आहे. वगारीच्या आकाराएवढी ३५ ते ४० डुकरे रामापूर शिवारात निर्धोक फिरत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.उपाययोजना फोलअशोक बोरोडेसह काही शेतकऱ्यांनी रानडुकरांना अटकाव करण्यासाठी शेताला सौर कुंपण घातले आहे. त्यालाही न जुमानता डुकरे शेतात शिरून बोंड्या फस्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीwildlifeवन्यजीव