शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महापालिकेच्या शाळेत ‘हाऊसफूल’चा बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:10 IST

खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.

ठळक मुद्देखासगी व्यवस्थापनाला टक्कर : पाचवीनंतरचे प्रवेश बंद, ८०० वर पटसंख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.महापालिकेच्या शिक्षक विभागातील हिंदी व इंग्रजी माध्यमाची ही सर्वात मोठी शाळा आहे. या शाळेत ८०० विद्यार्थी पटसंख्या आहे. महापालिकेच्या शहरातील अन्य शाळांमध्ये प्रवेशाची वानवा असताना या शाळेची पटसंख्या डोळ्यात अंजन भरणारी आहे. त्यामुळे या शाळेला आदर्श या नात्याने पाहिले जाते. या शाळेची येथवर प्रगती साधण्यात मुख्याध्यापक गोपाल कांबळे विशेष प्रयत्न केले आहे. नावीन्यपूर्ण विविध उपक्रम अन् शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत दर्जा उंचाविण्यावर भर दिल्यानेच या ठिकाणी सद्यस्थितीत पाचवीनंतरची प्रवेश प्रक्रिया आता बंद झाल्याचे फलक लावण्याची वेळ आली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, स्थायीचे माजी सभापती विवेक कलोती, सुनीता भेले, कल्पना बुरंगे यांचे मार्गदर्शन व उपक्रमात सातत्याने सहभाग राहत असल्याने पालकांनीही विश्वास टाकला आहे. हिंदी माध्यमाची शाळा असल्याने मुस्लीमबहुल भागातील विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे अधिक आहे.उन्हाळ्याच्या सुटीत २ ते ३ तास पायाभूत सरावअप्रगत विद्यार्थ्यांचा नियमित सराव वर्ग, इतर शाळांतून नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळ्याच्या सुटीत दररोज २ ते ३ तास पायाभूत सराव या शाळेत घेतला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पाठ्यक्रमासोबत मातीकाम, शिल्पकाम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदीद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. यासोबतच टाऊन हॉलमध्ये दरवर्षी होणारे स्रेहसंमेलन व यासाठी पालकांची भरगच्च उपस्थितीमुळे प्रतिसाद लाभत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.