शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

महापालिकेच्या शाळेत ‘हाऊसफूल’चा बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:10 IST

खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.

ठळक मुद्देखासगी व्यवस्थापनाला टक्कर : पाचवीनंतरचे प्रवेश बंद, ८०० वर पटसंख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.महापालिकेच्या शिक्षक विभागातील हिंदी व इंग्रजी माध्यमाची ही सर्वात मोठी शाळा आहे. या शाळेत ८०० विद्यार्थी पटसंख्या आहे. महापालिकेच्या शहरातील अन्य शाळांमध्ये प्रवेशाची वानवा असताना या शाळेची पटसंख्या डोळ्यात अंजन भरणारी आहे. त्यामुळे या शाळेला आदर्श या नात्याने पाहिले जाते. या शाळेची येथवर प्रगती साधण्यात मुख्याध्यापक गोपाल कांबळे विशेष प्रयत्न केले आहे. नावीन्यपूर्ण विविध उपक्रम अन् शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत दर्जा उंचाविण्यावर भर दिल्यानेच या ठिकाणी सद्यस्थितीत पाचवीनंतरची प्रवेश प्रक्रिया आता बंद झाल्याचे फलक लावण्याची वेळ आली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, स्थायीचे माजी सभापती विवेक कलोती, सुनीता भेले, कल्पना बुरंगे यांचे मार्गदर्शन व उपक्रमात सातत्याने सहभाग राहत असल्याने पालकांनीही विश्वास टाकला आहे. हिंदी माध्यमाची शाळा असल्याने मुस्लीमबहुल भागातील विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे अधिक आहे.उन्हाळ्याच्या सुटीत २ ते ३ तास पायाभूत सरावअप्रगत विद्यार्थ्यांचा नियमित सराव वर्ग, इतर शाळांतून नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळ्याच्या सुटीत दररोज २ ते ३ तास पायाभूत सराव या शाळेत घेतला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पाठ्यक्रमासोबत मातीकाम, शिल्पकाम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदीद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. यासोबतच टाऊन हॉलमध्ये दरवर्षी होणारे स्रेहसंमेलन व यासाठी पालकांची भरगच्च उपस्थितीमुळे प्रतिसाद लाभत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.