शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

अचलपूर बाजार समितीचे संचालक मंडळ फुर्रर्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST

फोटो पी ०१ अचलपूर परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने ...

फोटो पी ०१ अचलपूर

परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने संबंधितांची पाचावर धारण बसली. गुरुवारी परिसरातीलच गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर नतमस्तक होत एक वगळता सर्व संचालक मंडळ गावातून बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कुणाकडून अटकेची ‘पुडी’ सोडून ‘एप्रिल फुल’ करण्याचा प्रयत्न झाल्याचीही खमंग चर्चा आहे.

अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमधील सरळसेवा नोकरभरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामध्ये सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला व लता वाजपेयी यांच्याविरुद्ध अचलपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यादरम्यान नोकरभरती करणाऱ्या कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती, तर मंगेश, शैलेश व लता यांनी नागपूर न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अटकेतील सर्व आरोपींचे बयाण नोंदविले. तपासात अनेक गंभीर बाबी पुढे आल्याची कुणकुण संचालक मंडळाला लागली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून बाजार समितीच्या संचालक मंडळांत अस्वस्थता पसरली होती.

बॉक्स

जय गजानन... अन रफुचक्कर !

गुरुवारी बाजार समितीच्या आवारातील गजानन महाराजांच्या मंदिरात अनेकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. ‘आलेले संकट गजानना दूर कर’ असे म्हणत मिळेल त्या दिशेने तीन ते चार जणांच्या टोळक्यात संचालक मंडळ वेगवेगळ्या वाहनाने रफुचक्कर झाल्याची चर्चा आहे. यातील काही संचालकांना गुरुवारी दुपारी १२ नंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे माहिती मिळू शकली नाही.

बॉक्स (उडवू नये)

भादंवि १२० ब आणि ३४ ची दहशत

संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात खळबळ माजवून देणारा अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती या सरळ सेवा भरती प्रकरणात सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला, लता वाजपेयी, केएनके कंपनीचे संचालक यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४७१, ४६८, ३४, १२० बी अन्वये २१ डिसेंबर २०२० रोजी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे १२० बी (अवैज्ञानिक कट-कारस्थान करणे ) ३४ ( सामूहिक जबाबदारी) या कलमानुसार कोणत्या संचालकांचा किती सहभाग आहे, यावरूनच ही कारवाई होणार असून, संचालक मंडळाला केव्हाही अटक होण्याची भीती पाहता, त्यांनी पळ काढल्याची माहिती पुढे आली आहे.

कोट

सदर प्रकरणात पूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगळे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचा कुणाचा किती सहभाग आहे, हे पाहण्यात येईल व तपास सुरू आहे.

- सेवानंद वानखडे, ठाणेदार, अचलपूर