शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

अचलपूर बाजार समितीचे संचालक मंडळ फुर्रर्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST

फोटो पी ०१ अचलपूर परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने ...

फोटो पी ०१ अचलपूर

परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने संबंधितांची पाचावर धारण बसली. गुरुवारी परिसरातीलच गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर नतमस्तक होत एक वगळता सर्व संचालक मंडळ गावातून बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कुणाकडून अटकेची ‘पुडी’ सोडून ‘एप्रिल फुल’ करण्याचा प्रयत्न झाल्याचीही खमंग चर्चा आहे.

अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमधील सरळसेवा नोकरभरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामध्ये सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला व लता वाजपेयी यांच्याविरुद्ध अचलपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यादरम्यान नोकरभरती करणाऱ्या कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती, तर मंगेश, शैलेश व लता यांनी नागपूर न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अटकेतील सर्व आरोपींचे बयाण नोंदविले. तपासात अनेक गंभीर बाबी पुढे आल्याची कुणकुण संचालक मंडळाला लागली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून बाजार समितीच्या संचालक मंडळांत अस्वस्थता पसरली होती.

बॉक्स

जय गजानन... अन रफुचक्कर !

गुरुवारी बाजार समितीच्या आवारातील गजानन महाराजांच्या मंदिरात अनेकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. ‘आलेले संकट गजानना दूर कर’ असे म्हणत मिळेल त्या दिशेने तीन ते चार जणांच्या टोळक्यात संचालक मंडळ वेगवेगळ्या वाहनाने रफुचक्कर झाल्याची चर्चा आहे. यातील काही संचालकांना गुरुवारी दुपारी १२ नंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे माहिती मिळू शकली नाही.

बॉक्स (उडवू नये)

भादंवि १२० ब आणि ३४ ची दहशत

संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात खळबळ माजवून देणारा अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती या सरळ सेवा भरती प्रकरणात सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला, लता वाजपेयी, केएनके कंपनीचे संचालक यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४७१, ४६८, ३४, १२० बी अन्वये २१ डिसेंबर २०२० रोजी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे १२० बी (अवैज्ञानिक कट-कारस्थान करणे ) ३४ ( सामूहिक जबाबदारी) या कलमानुसार कोणत्या संचालकांचा किती सहभाग आहे, यावरूनच ही कारवाई होणार असून, संचालक मंडळाला केव्हाही अटक होण्याची भीती पाहता, त्यांनी पळ काढल्याची माहिती पुढे आली आहे.

कोट

सदर प्रकरणात पूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगळे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचा कुणाचा किती सहभाग आहे, हे पाहण्यात येईल व तपास सुरू आहे.

- सेवानंद वानखडे, ठाणेदार, अचलपूर