शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'जयस्तंभ' बघतोय निष्पांपाचा 'रक्तरंजित खेळ'

By admin | Updated: April 24, 2016 00:13 IST

स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे.

अपघाताची मालिका : सर्वपक्षीयांची जयस्तंभ हटविण्याची मागणीनरेंद्र जावरे परतवाडास्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. परिणामी 'जयस्तंभ' हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परतवाडा शहरात जयस्तंभ ते बैतुल स्टॉप व बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या जयस्तंभ चौकापासून या कामाची सुरुवात झाली, तोच एकाकी पडला आहे. परिणामी शहरात जाण्यासाठी असलेला जयस्तंभ वळण रस्ता अरुंद झाला आहे. चौपदरीकरणात रुंद झाला आहे. वाहनचालक जयस्तंभ वळण रस्त्याचा वापर न करता थेट आपली वाहने नेत असल्याने अपघाताची मालिका सरू आहे. जयस्तंभपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अचलपूरचे आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वाकडे जात आहे.रक्तरंजित खेळस्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा शुरविरांच्या स्मरनार्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक गावात जयस्तंभ उभारण्यात आले. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेला जयस्तंभ भाग आता अपघाताच्या मालिकेत निष्पाप जीवांचा बळी जाताना बघत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सर्वांना स्वातंत्र्याने जगता यावे याची आठवण करून देण्यापेक्षा एक, दोन अशा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची गिणती करावी लागत आहे.जागा प्रस्तावितरस्ता चौपदीकरणात जयस्तंभ हटवून बाजूच्या छत्रपती पार्क पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. आ.बच्चू कडू यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदसुध्दा केली असून मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असताना 'जयस्तंभ' च्या जागेबद्दल उप-विभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन स्वातंत्र्याचे प्रतीक जयस्तंभ रस्त्याच्या मधात उभारण्याची मागणी भारतीय बौध्द परिषदेचे महासचिव बी.एस.इंगळे यांनी केली.