शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जयस्तंभ' बघतोय निष्पांपाचा 'रक्तरंजित खेळ'

By admin | Updated: April 24, 2016 00:13 IST

स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे.

अपघाताची मालिका : सर्वपक्षीयांची जयस्तंभ हटविण्याची मागणीनरेंद्र जावरे परतवाडास्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. परिणामी 'जयस्तंभ' हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परतवाडा शहरात जयस्तंभ ते बैतुल स्टॉप व बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या जयस्तंभ चौकापासून या कामाची सुरुवात झाली, तोच एकाकी पडला आहे. परिणामी शहरात जाण्यासाठी असलेला जयस्तंभ वळण रस्ता अरुंद झाला आहे. चौपदरीकरणात रुंद झाला आहे. वाहनचालक जयस्तंभ वळण रस्त्याचा वापर न करता थेट आपली वाहने नेत असल्याने अपघाताची मालिका सरू आहे. जयस्तंभपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अचलपूरचे आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वाकडे जात आहे.रक्तरंजित खेळस्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा शुरविरांच्या स्मरनार्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक गावात जयस्तंभ उभारण्यात आले. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेला जयस्तंभ भाग आता अपघाताच्या मालिकेत निष्पाप जीवांचा बळी जाताना बघत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सर्वांना स्वातंत्र्याने जगता यावे याची आठवण करून देण्यापेक्षा एक, दोन अशा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची गिणती करावी लागत आहे.जागा प्रस्तावितरस्ता चौपदीकरणात जयस्तंभ हटवून बाजूच्या छत्रपती पार्क पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. आ.बच्चू कडू यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदसुध्दा केली असून मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असताना 'जयस्तंभ' च्या जागेबद्दल उप-विभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन स्वातंत्र्याचे प्रतीक जयस्तंभ रस्त्याच्या मधात उभारण्याची मागणी भारतीय बौध्द परिषदेचे महासचिव बी.एस.इंगळे यांनी केली.