शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

रक्तपाताचा निषेध रक्तदानाने

By admin | Updated: January 7, 2017 00:08 IST

शासन दरबारी न्याय मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना लाठीमाराचा सामना करावा लागला.

१०० पोलखोल सभा : गाडगेबाबांच्या समाधी दर्शनाने अन्नत्यागाची सांगताअमरावती: शासन दरबारी न्याय मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना लाठीमाराचा सामना करावा लागला. त्यांचे रक्त सांडले. ‘नांगर आंदोलन’ चिरडण्यासाठी पोलिसांनी रक्तपात केला. पोलिसांनी केलेल्या रक्तपाताचा निषेध आम्ही रक्तदानाने केला, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.स्थानिक पंचवटीचौक ते जिल्हाकचेरीदरम्यान गुरुवारी प्रहारच्यावतीने काढण्यात आलेल्या नांगर मोेर्चात सहभागी शेतकऱ्यांवर विनाकारण बेछुट लाठीमार केल्याप्रकरणी आ. कडू यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी देशातील हे पहिले आंदोलन होते. ते चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना अप्रत्यक्षपणे लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाने महिला व शेतकऱ्यांचे रक्त सांडले. पोलिसांच्या रक्तपाताच्या याकृतीचा निषेध रक्तदान करून नोंदविल्याने तरी शासनाचे डोळे उघडतील, असे आ. कडू म्हणाले. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी असून आता ठिकठिकाणी शासनाची पोलखोल करणाऱ्या १०० सभा घेऊन सरकारच्या नाकी नऊ आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आचारसंहिता असल्यामुळे अधिक आक्रमक होणार नाही. परंतु लाठीमाराचा हिशेब पोलिसांकडून घेणारच, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी अन्नत्याग आंदोलनाची सांगता करताना आयोजित रक्तदान उपक्रमात ५१ जणांनी रक्तदान केले. जिल्हाकचेरी ते गाडगेबाबा समाधीस्थळापर्यंत पायी रॅली काढून आमचे काय चुकले, हे गाडगेबाबांपुढे नतमस्तक होऊन विचारणार असल्याचेही आ.कडू म्हणाले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाबाबत जनजागृतीसाठी पहिली सभा नजीकच्या कठोरा येथे तर दुसरी सभा नया अकोला येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखलअमरावती : अन्नत्याग आंदोलनात गुरुवारी रात्री आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. शुक्रवारी नवनीत राणा, बबलू शेखावत, दिनेश बूब, सोमेश्वर पुसतकर आदींनी आ. कडुंची भेट घेतली.‘प्रहार’ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल : प्रहार पक्षाच्या ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याकार्यकर्त्यांनी दगडफेक करून सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान केले तथा बेकायदेशीर जमाव जमवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी एपीआय फिरोज पठाण यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३,३३२, ३३३, ३३६, १८८, ३०७, ३, ४, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्र. अधि. कलम १३५, १३६ मुपोका कलम ७ क्रिमीनल लॉ अमेन्टमेंटन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)सीएम ते पीएम शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध आता देशपातळीवर नोंदविला जाईल. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव असलेल्या गुजरातेमधील वडगाव असा चार हजार किमी.चा पल्ला गाठून आसूड आंदोलन केले जाईल, असे आ. कडू यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचा सत्यपडताळणी अहवाल मुख्यमंत्र्यांकडेआ. बच्चू कडू यांच्या नांगर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी सत्यपडताळणी अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यात जखमी मोर्चेकऱ्यांचे बयाण नोंदविले आहे. तसेच कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून वस्तुस्थिती सादर केल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.