शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

लसीकरणानंतरही करता येते रक्तदान - श्यामसुंदर निकम (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

अमरावती : कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्तदान करता येईल की नाही, हा नागरिकांमध्ये संभ्रम असेल. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली, हिमोग्लोबीन ...

अमरावती : कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्तदान करता येईल की नाही, हा नागरिकांमध्ये संभ्रम असेल. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली, हिमोग्लोबीन चांगले असतील त्या व्यक्तीला लसीकरणानंतर १४ दिवसांतच रक्तदान करता येते. त्यामुळे २८ दिवसांची वाट न पाहता आयोजित शिबिरांमध्ये इच्छुकांनी मनात भीती न बाळगता बिनधास्त रक्तदान करण्याचे आवाहन जिल्ह्या शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी लोकमतद्वारा घेण्यात आलेल्या मुलाखतीत केले.

कोरोना काळात कॉलेजेस, सामाजिक उपक्रम, एनजीओंची कार्य थांबविण्यात आल्यामुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिरे फार कमी प्रमाणात झालीत. मात्र, अमरावती जिल्ह्याला खऱ्या अर्थाने रक्ताची देण लाभलेली असल्याने येथे उपचारार्थ येणाऱ्या विविध भागातील गरजू रुग्णांना वेळेवर हवे त्या गटाचे रक्त उपलब्ध झाले. एका हाकेवर अमरावतीकरांनी ब्लड डोनेटसाठी हजर झालेत. त्यामुळे कुठेच रक्ताची कमतरता भासली नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी मुलाखतीत सांगितले.अमरावती जिल्ह्यात ड्लड बँकेची सुरुवात सन १९८० मध्ये झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ ठिकाणी शासकीय रक्तपेढी आहेत. यामध्ये वरूड, मोर्शी, अचलपूर, धारणी, चिखलदरा, चुरणी, दर्यापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व डफरीनचा समावेश आहे. लोकमतद्वारा नियोजित रक्तदान शिबिराला जिल्हा आरोग्य प्रशासनाचे सहकार्य राहील. या अभियानाच्या माध्यमातून रुग्ण सेवेत भरीव मदत होणार आहे. श्रद्धेय बाबूजी ऊर्फ जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीप्रीत्यर्थ राबवित असलेल्या या उपक्रमाचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून स्वागत आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम म्हणाले. लोकमतने आमंत्रित करून माझे मार्गदर्शन घेतल्याचे समाधान त्यांनी संस्कृत कवितेतून केले.

बॉक्स

यांना भासते रक्ताची गरज

हिमोफिलिया, सिकलसेल, थॅलेसिमियाग्रस्तांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यानंतर आपघातग्रस्त, सिझेरियन दरम्यान महिलांना अतिरक्तस्त्राव झाल्याने, अनिमियाग्रस्तांना रक्ताची आवश्यकता भासते. अशांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिरे घेणे गरजेचे आहे. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. निकम यांनी यावेळी केले.