शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

लॉकडाऊनमध्ये स्थिलता मिळताच नाकेबंदी पॉईंट केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता ...

अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता पोलिसांचाही ताण थोडा कमी झाला आहे. शहर हद्दीतील काही नाकाबंदी पॉईंट कमी करण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य चौकातील फिक्स पॉईंटवर कसून चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळी ११ वाजतानंतर उन्हाचा तडखा वाढत असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. कडक लॉकडाऊमध्ये शहरात ४५ ठिकाणी फिक्स पॉईंट, तर शहराच्या सीमारेषांच्या बाहेर सात ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले होते. तेव्हा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता थोडी शिथिलता मिळल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर बंदी असून त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला जात आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक गुन्हे गाडगेनगर ठाण्यात नोंदविले गेले. आता फिक्स पाईंट व नाकाबंदी पाॅईंट निम्मे करण्यात आले आहे. मात्र सांयकाळी पंचवटी चौक, शेगाव नाका, कठोरा नाका, इर्विन चौकातील वाहतूक शाखा, जयस्तंभ चौक, वेलकम पॉईंट, राजकमल चौक, इतवारा चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, असे आदेश यापूर्वीच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी संबंधित ठाणेदारांना दिले आहे. पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंगसुद्धा वाढली आहे.