शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

लॉकडाऊनमध्ये स्थिलता मिळताच नाकेबंदी पॉईंट केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता ...

अमरावती : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता शिथिलता देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे आता पोलिसांचाही ताण थोडा कमी झाला आहे. शहर हद्दीतील काही नाकाबंदी पॉईंट कमी करण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य चौकातील फिक्स पॉईंटवर कसून चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळी ११ वाजतानंतर उन्हाचा तडखा वाढत असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. कडक लॉकडाऊमध्ये शहरात ४५ ठिकाणी फिक्स पॉईंट, तर शहराच्या सीमारेषांच्या बाहेर सात ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले होते. तेव्हा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता थोडी शिथिलता मिळल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र, सकाळी ११ वाजतानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर बंदी असून त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला जात आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक गुन्हे गाडगेनगर ठाण्यात नोंदविले गेले. आता फिक्स पाईंट व नाकाबंदी पाॅईंट निम्मे करण्यात आले आहे. मात्र सांयकाळी पंचवटी चौक, शेगाव नाका, कठोरा नाका, इर्विन चौकातील वाहतूक शाखा, जयस्तंभ चौक, वेलकम पॉईंट, राजकमल चौक, इतवारा चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, असे आदेश यापूर्वीच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी संबंधित ठाणेदारांना दिले आहे. पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंगसुद्धा वाढली आहे.