शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या डेल्टा प्लसची नाकेबंदी, दररोज दोन हजारांवर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:01 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात ७२ हजारांवर संक्रमितांची नोंद झाली. १२१९ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.  कोरोनाच्या डेल्टा या विषाणूमुळेच संक्रमण वाढले. विषाणूपेक्षा याचे संक्रमण गतिशील असल्यामुळे जिल्ह्यात गहजब झाला होता. जिल्हा सीमेवरील नागपूर, यवतमाळ, अकोला व मध्य प्रदेशातून रुग्ण अमरावतीला उपचारार्थ आलेत.

ठळक मुद्देजुलैमध्ये ४२८ रुग्णांची नोंद, संसर्ग माघारला, नियम पाळणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात महिनभरापासून कोरोनाचा संसर्ग माघारला असतानाच आरोग्य यंत्रणेद्वारा तिसऱ्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा महिनाभर निर्बंध वाढविण्यात आले. आता बुधवारपासून यामधून मुक्तता झाली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात ७२ हजारांवर संक्रमितांची नोंद झाली. १२१९ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.  कोरोनाच्या डेल्टा या विषाणूमुळेच संक्रमण वाढले. विषाणूपेक्षा याचे संक्रमण गतिशील असल्यामुळे जिल्ह्यात गहजब झाला होता. जिल्हा सीमेवरील नागपूर, यवतमाळ, अकोला व मध्य प्रदेशातून रुग्ण अमरावतीला उपचारार्थ आलेत. यासोबतच त्यांचे नातेवाईकही असल्याने डेल्टाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला होता, ही वस्तूस्थिती आहे.

कॉन्टॅक्ट ट्र्रेसिंगकोरोनाचा संसर्ग कमी होताच आरोग्य विभागाने उसंत घेतल्याने अलीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये काही प्रमाणात कमी आलेली आहे. मात्र, शासनाद्वारा तिसऱ्या लाटेचा अलर्ट जाहीर केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार किमान एका रुग्णामागे किमान १० जणांशी संपर्क केला जात आहे.

कोठे, काय घेतली जातेय दक्षता

- बसस्थानक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे बससेवा सुरु करण्यात आली. सुरुवातीला ५० टक्के, तर आता पूर्ण क्षमतेने सेवा सुरू आहे. बसस्थानकावर फारशी दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून आले.

- वेलकम पाईंट : सायंकाळ झाल्यानंतर येतील वेलकम पाॅइंटवर प्रवाशांची गर्दी होते. या ठिकाणी अनेकांना मास्क नसतानाही महापालिका प्रशासनाद्वारा कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.

- रेल्वे स्थानक :  येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काही प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर रेल्वेस्थानकावर फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. 

- बाजारपेठ : राजकमल, जयस्तंभ, राजापेठ जवाहर गेट आदी भागातील व्यापारी संकुल व दुकांनामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन अभावानेच होताना दिसत आहे.

ग्रामीण भागावर अधिक लक्षकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमण ग्रामीण भागात झाले होते. त्यामुळे यावेळी दुसऱ्या लाटेतील हॉटस्पॉट तालुक्यांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात नोंद झालेले ५५ टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांमध्ये १० टक्के अधिक क्षमतेने बेड वाढविण्यात आलेले आहे. याशिवाय काही बेड ऑक्सिजनचेदेखील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या