शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:10 IST

अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा : इजा पोहोचवल्यास दोन वर्षे कैद

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. शहरातील परकोटसह दुल्हा गेट, हिरापुरा गेट, जीवनपुरा गेट आणि हौज कटोरा या वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या वास्तूंचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविली आहे. त्यांची हानी, स्वरूपात बदल, विद्रुपीकरण वा दुरुपयोग याकरिता दोन वर्षे कारावास किंवा एक लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.अचलपूरच्या या पाचही वास्तूंवर लक्ष ठेवण्याकरिता पाच स्वतंत्र चौकीदारांची नियुक्ती पुरातत्त्व विभागाने केली आहे. देशपातळीवरील ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच येथील स्थळांची विकासकामे पूर्णत्वास नेली जात आहेत. सिलीगुडी येथील पेव इनफ्रास्ट्रक्चर ही कंपनी अकोला, नागपूर, दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कामे पूर्णत्वास नेत आहे. याकरिता लागणारा खास दगड सिलीगुडीची ही कंपनीच पुरवित आहे. ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या जुन्या दगडांशीच मिळताजुळता हा दगड आहे.शहराच्या चहुबाजूने असलेल्या परकोटाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यास अतिक्रमणाने ग्रासले आहे. केवळ ५ ते ६ किलोमीटर लांबीचाच परकोट शिल्लक आहे. हौज कटोरा नामक अष्टकोणी वास्तूची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. परकोटला दोन्ही बाजूने आणि हौज कटोरालगत आवारभिंत मजबूत अशा लोखंडी रेलिंगसह उभारण्यात आली. ‘आपण नवाब इस्माईलखानचे तट आणि दरवाजे ह्या संरक्षित स्मारकाच्या २०० मीटर विनियमित सीमेत आहात’ याची जाणीव तेथील फलक करून देत आहेत. सीमेची जाणीव करून देणारा वेगळा फलक हौजकटोरा येथेही लावण्यात आला आहे. पडझड झालेल्या वास्तूंची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने पुरातत्त्व विभाग करणार आहे.भारतीय पुरातत्त्व विभागाचे लागले फलकसंरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेपासून २०० मीटर पर्यंतचा भाग विनियमित क्षेत्र म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात बांधकाम व तत्संबंधी कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलक त्या त्या ठिकाणी पहिल्यांदाच लावण्यात आले आहेत. या वास्तूलगतच्या परिसरात पर्यटकांकरिता पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व अन्य आवश्यक बाबी पूर्णत्वास नेण्यास भारत सरकारने विभागाला सुचविले आहे.