शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:10 IST

अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा : इजा पोहोचवल्यास दोन वर्षे कैद

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. शहरातील परकोटसह दुल्हा गेट, हिरापुरा गेट, जीवनपुरा गेट आणि हौज कटोरा या वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या वास्तूंचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविली आहे. त्यांची हानी, स्वरूपात बदल, विद्रुपीकरण वा दुरुपयोग याकरिता दोन वर्षे कारावास किंवा एक लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.अचलपूरच्या या पाचही वास्तूंवर लक्ष ठेवण्याकरिता पाच स्वतंत्र चौकीदारांची नियुक्ती पुरातत्त्व विभागाने केली आहे. देशपातळीवरील ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच येथील स्थळांची विकासकामे पूर्णत्वास नेली जात आहेत. सिलीगुडी येथील पेव इनफ्रास्ट्रक्चर ही कंपनी अकोला, नागपूर, दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कामे पूर्णत्वास नेत आहे. याकरिता लागणारा खास दगड सिलीगुडीची ही कंपनीच पुरवित आहे. ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या जुन्या दगडांशीच मिळताजुळता हा दगड आहे.शहराच्या चहुबाजूने असलेल्या परकोटाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यास अतिक्रमणाने ग्रासले आहे. केवळ ५ ते ६ किलोमीटर लांबीचाच परकोट शिल्लक आहे. हौज कटोरा नामक अष्टकोणी वास्तूची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. परकोटला दोन्ही बाजूने आणि हौज कटोरालगत आवारभिंत मजबूत अशा लोखंडी रेलिंगसह उभारण्यात आली. ‘आपण नवाब इस्माईलखानचे तट आणि दरवाजे ह्या संरक्षित स्मारकाच्या २०० मीटर विनियमित सीमेत आहात’ याची जाणीव तेथील फलक करून देत आहेत. सीमेची जाणीव करून देणारा वेगळा फलक हौजकटोरा येथेही लावण्यात आला आहे. पडझड झालेल्या वास्तूंची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने पुरातत्त्व विभाग करणार आहे.भारतीय पुरातत्त्व विभागाचे लागले फलकसंरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेपासून २०० मीटर पर्यंतचा भाग विनियमित क्षेत्र म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात बांधकाम व तत्संबंधी कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलक त्या त्या ठिकाणी पहिल्यांदाच लावण्यात आले आहेत. या वास्तूलगतच्या परिसरात पर्यटकांकरिता पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व अन्य आवश्यक बाबी पूर्णत्वास नेण्यास भारत सरकारने विभागाला सुचविले आहे.