शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लघु पाटबंधारे विभागाचा गावतलाव फोडला

By admin | Updated: July 6, 2015 00:10 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) ...

पाणीसाठ्यात घट : ७५ हजारांचे नुकसान, पोलिसांत तक्रारचांदूरबाजार : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) येथील २० वर्षांपूर्वी बांधलेला तलाव काही शेतकऱ्यांनी फोडला. त्यामुळे तलावातील बराचसा पाणीसाठा रिकामा झाला असून नाल्यात पाणी व्यर्थ वाहत आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने घेऊन याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुध्द पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे गाव तलावाची निर्मिती करून २० वर्षांपूर्वीच्या तलावाला जेसीबीद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. सन १९९३-९४ मध्ये वणी (बेलखेडा) शिवारात तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सात शेतकऱ्यांच्या ५ हेक्टर ५६ आर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. अ. रहीम शे. मुनीर या शेतकऱ्यांनी सदर तलाव जेसीबीने तोडल्याची बाब गावकऱ्यांच्या चर्चेतून उघड झाली. अ. रहीम यांचे मालकीची ३६ आर जमीनदेखील या तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर हा तलाव २०१० मध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.सदर तलाव १ जुलै रोजी रात्री तोडल्याचे उघड होताच पं.स. सदस्य मंगेश देशमुख यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावडे व वणीचे तलाठी यांना दिली. त्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शशीकांत कुळकर्णी यांना दिल्यावरुन त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन या घटनेची तक्रार चांदूरबाजार पोलिसात केली. यात त्यांचे ७५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. तक्रारी नुसार सदर तलावाचे बांधकाम अ. रहीम शे. मुनीर व इतर लोकांनी फोडल्याची कबुली अ. रहीम यांनी दिल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. ठाणेदार डी.बी. तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणात कलम ४३० भादंविच्या व प्रॉपर्टी डेमेज अ‍ॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)