शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

कामगारांच्या नावांवर ‘ब्लॅकमनी’

By admin | Updated: November 19, 2016 00:07 IST

देशातील काळा पैसा बाद करण्यासाठी केंद्र सरकारने गत आठवड्यात पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला.

व्यावसायिकांचा नवा फंडा : चार ते पाच महिन्यांचे वेतनही जमा अमरावती : देशातील काळा पैसा बाद करण्यासाठी केंद्र सरकारने गत आठवड्यात पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यानिर्णयानंतर काही व्यावसायिक, उद्योजकांनी ‘ब्लॅकमनी’ ‘व्हाईट’ करण्यासाठी चक्क कामगारांच्या नावे लाखो रूपये जमा करण्याचा नवा फंडा वापरला आहे. शहरानजीकच्या नागपूर महामार्गावरील नामांकित कापडविक्री संकुलातील कामगारांच्या नावे ‘ब्लॅकमनी’ टाकल्याची माहिती आहे.हजार-पाचशे रुपयांचे चलन बाद करण्याचा निर्णय होताच औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात भूकंप आल्याचे चित्र आठवडाभरापासून दिसत आहे. नांदगाव पेठ आणि गोपालनगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत कार्यरत कामगारांना त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार ते एक लाख रुपये ‘ब्लॅकमनी’ देऊन तेच पैसे ‘व्हाईट’ करण्याची शक्कल लढविली आहे. अनेक उद्योजकांकडे कार्यरत कामगारांना बँकेतून वेतन दिले जात असताना आॅक्टोबर महिन्यातील वेतन रोखीने देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. नागपूर महामार्गालत रेडिमेड कापड व्यवसायात विदर्भात सर्वदूर नावाजलेल्या संकुलात प्रतिष्ठानच्या मालकांकडून कामगारांना पाच ते सहा महिन्यांचे अग्रीम वेतनही देण्यात आले आहे. दरवेळी बँकेत वेतन जमा होत असताना यावेळी चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा कामगारांच्या हाती सोपविल्या आहेत. कामगारांनी सुद्धा नाईलाजास्तव जुने चलन वेतनापोटी स्वीकारले आहे. गत आठवड्यात कामगारांच्या वेतनाच्या नावावर व्यावसायिक, उद्योजकांनी कोट्यवधीचा ‘ब्लॅकमनी’ ’व्हाईट’ केला आहे. कामगारांच्या व्यथा आणि परिस्थितीचा लाभ घेऊन कामगारांमार्फत ‘काळा पैसा पांढरा’ करणारे उद्योजक, व्यावसायिकांवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. अशा एक ना अनेक मार्गांनी ब्लॅक मनीची विल्हेवाट लावली जात आहे. काळ्या पैशाला पांढरा करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. त्यातल्या त्यात अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पैसा सुरक्षित ठेवण्याची पद्धत जरा अधिकच प्रचलित झाली आहे. बँकेच्या रांगेत रोजंदारी मजूरपैसे मिळविण्यासाठी बँक, एटीएम, टपाल खात्यात नागरिकांची झुंबड आजही कायम आहे. मात्र, पैसे मिळविण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे असणाऱ्यांंमध्ये काही रोजंदारांंचाही भरणा आहे. ‘नोटाबंदी’ मुळे बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे रिकाम्या हातांना काम मिळविण्यासाठी कामगार रांगेत उभे राहात असल्याचे चित्र आहे. पैसे काढण्यासाठी दिवसभर व्यावसायिक रांगेत उभे राहू शकत नसल्याने कामगारांना बँकेच्या रांगेत उभे करुन वेळ आणि श्रमाची बचत करीत आहेत. मात्र या प्रकारामुळे कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे, हे मात्र खरे आहे. एमआयडीसीत कामगारांच्या खात्यात अग्रीम रक्कमकेंद्र सरकारने पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक गोपालनगर परिसरातील एमआयडीसीत काही उद्योजकांनी कामगारांच्या बँक खात्यात (करंट) मोठी रक्कम अग्रीम राशी म्हणून जमा केली. त्यानंतर दोन ते तीन कामगारांच्या खात्यातून जुने चलन बदलवून नवे चलन मिळविल्याची माहिती आहे. एका मोठ्या उद्योजकांनी चक्क ३०० कामगारांच्या नावे अग्रीम राशी दिल्याची माहिती एका कामगाराने दिली.