शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आमदाराच्या हुकूमशाहीविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:13 IST

आ. अनिल बोंडे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आहेत. त्यांची वागणूक हुकूमशाहाप्रमाणे आहे.

ठळक मुद्देवरुडात राजकीय भूकंप : जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्षाचा समावेश

आॅनलाईन लोकमतवरूड : आ. अनिल बोंडे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आहेत. त्यांची वागणूक हुकूमशाहाप्रमाणे आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा व वरूड तालुका भाजप कार्यकारिणीचे आम्ही ३१ पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहोत, अशी माहिती भाजपक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरूड येथे मंगळवारी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.अनपेक्षित घटनाक्रमामुळे वरूड भाजपक्षात राजकीय भूकंप आला असून, याचे हादरे आमदारांना बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांत दोन जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष व भाजप ग्रामीण कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे यांनी सांगितले. तालुक्यामध्ये मागील तीन दशकांपासून भाजप जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंतांना आ. बोंडे मागे ठेवत आहेत, तर जनसंग्रामच्या कार्यकर्त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान देत आहेत. भाजपक्षात केवळ कंत्राटदार व जुन्या जनसंग्रमाच्याच कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यामध्ये असंतोष खदखदत होता. अखेर असंतोषाचा फुगा फुटला. पदाधिकाºयांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, विदर्भ संघटनमंत्री, जिल्हाध्यक्ष तसेच पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत.नाराजीचा फुगा फुटलादरम्यान, २०१५ मध्ये राष्ट्रीय संत्रा परिषदेला मुख्यमंत्री व गडकरींच्या कार्यक्रमापासून निष्ठावंत पदाधिकाºयांना दूर ठेवण्यात आले. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पदाधिकाºयांच्या शिफारस असलेले उमेदवार डावलून नवख्यांना संधी दिली. याचमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला. यंदा झालेल्या राष्ट्रीय संत्रा कृषी विकास परिषदेत संघटनेला बाजूला ठेवण्यात आले. नुकत्याच गव्हाणकूंड येथे झालेल्या सौर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर मंडळ अध्यक्षासह आदी पदाधिकाऱ्यांना कुठेही स्थान देण्यात आले नाही. यापुढे आणखी अपमान सहन करणार नसल्याचे सुतोवाच यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी केले.यांनी दिला राजीनामाराजीनामा देणाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, जिल्हा सचिव प्रवीण राठी, अनुसूचित आघाडीचे सुनील गवई, अपंग सेलचे लीलाधर भोंडे, समीर ठाकरे, मगेश खैरकर, शांतीकुमार छांगाणी, सुनील क्षीरसागर, जगदीश बेलसरे, विलास बोहरूपी, विलास घोंगडे, भाजप किसान आघाडीचे महादेव जवादे, दिलीप वानखडे, सुरेंद्र दोड, बलदेव वानखडे, मंगेश लोखंडे, संजय कोहळे, नीलेश गोमकाळे, अशफाक शाह, मनीष शिरभाते, हेमंत कडू, विनोद पाचघरे, वकार खान, अतुल सातपुते, मो. आतीफ अन्वर, गणपत काळे यांच्यासह एकूण ३१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.गव्हाणकुंडमध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांना नेत्यांपर्यंत पोहोचता आले नाही. ही नाराजी पक्षाकडे व्यक्त करायला हवी होती. भाजपमध्ये पत्रपरिषदेतून नाराजी व्यक्त करण्याची पद्धत नाही. माझ्या मंत्रीपदासंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या काही बातम्यांचाही हा परिणाम असू शकतो.- अनिल बोंडे, आमदार, मोर्शी-वरूड