शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बियाणीची श्रेया अव्वल

By admin | Updated: May 28, 2015 00:23 IST

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९१.३३ टक्के : विभागात १ लाख १७ हजार ८६२ विद्यार्थी उत्तीर्ण अमरावती : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रेया जयदीप मांडवगडे ही ९७.३८ टक्के गुणांसह जिल्हातूनच नव्हे तर अमरावती विभागातून अव्वल ठरली आहे. यंदाही जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच वरचष्मा आहे. जिल्ह्यातून ९४.६५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाचाच विज्ञान शाखेचा विद्यार्थी हृषीकेश पतंगराव याने ९६.७६ टक्के गुणांसह जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी टिंगणे ही ९६.६५ टक्के गुणांसह तृतीय स्थानी आली. गेल्या वर्षी या महाविद्यलयातून २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९९.५८ टक्के लागला असून या महाविद्यालयाचा विद्यार्थी रूपेश वानखडे याने ९५.६६ टक्के, एम.पी. बानाईत याने ९५.२६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विद्याभारती महाविद्यालयाचा निकाल ८७.७७ टक्के लागला असून या महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ९१.९७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे. सर्वांच्या मदतीनेच यशाची परपंराब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या यशाची पंरपंरा सर्वाच्याच मदतीने मिळाली आहे. मी केवळ निमीत्त मात्र, आहे. विद्यार्थ्यांंच्या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना हवी तशी मदत करण्याचे कार्य सर्वांनीच केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बारिकसारिक गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना कशी मदत हवी याकडे सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आल्यानेच महाविद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल केली आहे. मुलांना हुशार असल्याचे सांगण्यापेक्षा तुम्ही काय काय चुका करता याबद्दल अवगत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या चुकाचे समाधान करण्यात आले आहे. आमच्या महाविद्यालयील मुले अभ्यासात चांगले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी सर्वाच्याच मदतीने यश संपादन केले आहे. असे मत ब्रिजलाल बियाणी विज्ञान कनीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. लोहिया यांनी व्यक्त केले.