शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबतची कटुता संपली

By admin | Updated: April 17, 2016 23:59 IST

भीमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणानंतर भाजप आणि युवा स्वाभीमान यांच्यामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ....

पत्रपरिषद : रवी राणा यांची माहिती; मुख्यमंत्री ३० एप्रिल रोजी भीमटेकडीवर येणारअमरावती : भीमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणानंतर भाजप आणि युवा स्वाभीमान यांच्यामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुमश्चक्रीला अखेर आ. राणांकडूनही पूर्णविराम मिळाला. रविवारी आयोजित पत्रपरिषदेत आ. रवी राणा यांनी आता भाजपसोबतची कटुता संपल्याचे जाहीर केले. याप्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला असून ३० एप्रिल रोजी फडणवीस हे भीमटेकडीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येणार असल्याची माहिती आ. राणा यांनी या पत्रपरिषदेतून दिली. आ. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याप्रकरणी १५ मिनीट चर्चा झाली असून ते सविस्तर बोलले आहेत. ३० एप्रिल रोजी रेमण्ड फॅक्टरीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री येत आहेत. भीमटेकडीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दलच्या अपूर्ण राहिलेल्या काही तांत्रिक बाबी त्वरेने पूर्ण के ल्या जातील आणि स्वत: बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यानी दिल्याचे, राणांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे भीमटेकडी सौंदर्यीकरण प्रस्तावासाठी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून दिल्याचे आ. राणा यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपसोबतची कटूता संपली असून भाजपविरोधात कोणतेही आंदोलन न करण्याची भूमिका राणांनी जाहीर केली. विकासकामांसाठी आपण मुख्यमंत्र्यासोबत असल्याचा उच्चार यावेळी राणांनी केला. १४ एप्रिल रोजी महामानवाचा पुतळा झाकून ठेवणे संयुक्तिक नसल्याने पुतळ्याचे अनावरण यथोचित होते. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीखातर बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचेही राणा म्हणाले. बाबासाहेब कुण्या जाती-धर्माचे नाहीतअमरावती : डॉ.बाबासाहेब हे कुण्या जाती-धर्माचे नव्हे, समस्त भारतीयांचे आराध्य आहेत. आता मुख्यमंत्री स्वत: भीमटेकडीवर बाबासाहेबांच्या पुुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असल्यामुळे ही बाब मी ‘सकारात्मक’ मानतो. पुतळा अनावरणावरून राजकारण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. राजकारणात शाब्दिक वाद, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच राहतात. त्यामुळे एखाद्याच्या कार्यालयावर हल्ला करणे योग्य असते काय, असा सवाल राणांनी उपस्थित केला. भाजपसोबत आपला कोणताही वैयक्तिक वाद नाही, असे राणांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, नगरसेवक सुनील काळे, बबन रडके, जीतू दुधाने, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना समज दिलीभाजप आणि युवा स्वाभिमान संघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरणानंतर उद्भवलेल्या वादाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना योग्य समज दिली आहे. आता आमचा भाजपसोबत कोणताच वाद नाही. भाजयुमोचे शहाराध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले आहे. दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेऊ, असेही आ. राणांनी सांगितले. पालकमंत्र्यांवरील टीका ही वैयक्तिक बाबभीमटेकडीवर डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा अनावरणप्रसंगी पालकमंत्री पोटे यांच्यावर केलेली टीका ही वैयक्तिक होती. या कार्यक्रमात मी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. पुतळा अनावरणात पालकमंत्र्यांनी अडथळा आणला म्हणून ते व्यक्तव्य केले होते. ते राजकीय पक्षासाठी नव्हते. भाजपसोबत वैयक्तिक वाद नसल्याचे देखील यावेळी आ. राणा म्हणाले. पालकमंत्री हे सगळ्यांचे आहेत. मात्र, ते विकासकामांमध्ये अडथळे आणतात आणि बरेचदा फोन देखील घेत नाहीत, असा आरोपही राणांनी केला.पालकमंत्र्यांसोबत ‘खुन्नस’ नाहीराजकारणात कधीही द्वेष बाळगायचा नसतो. पालकमंत्र्यांनी पुतळा अनावरणात अडथळे आणले म्हणून त्यांच्याविरोधात मी आरोप केलेत. खोडके दाम्पत्यासोबत राजकीय वाद असला तरी ते माझ्या आई-वडिलांसमान आहेत. तर संजय बंड हे वडिलबंधू आहेत. उद्धव ठाकरेंचा देखील मला फोन येतो. राजकारणात शाब्दिक वाद होतच असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांसोबत खुन्नस नाही, असे प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आ.रवी राणा म्हणाले.पुतळ्याचा अनादर होऊ नये म्हणूनच केले अनावरणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती १४ एप्रिल रोजी देश, विदेशात साजरी केली जात असताना यादिवशी बाबासाहेबांचा भीमटेकडीवरील तो पुतळा झाकून ठेवणे योग्य नव्हते. बौद्ध धम्मप्रचार समितीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्याअनुषंगाने बैठक झाली. महापालिका आयुक्तांनी जागा हस्तांतरित केली. मात्र, अचानक सूत्रे फिरली आणि पुतळा अनावरणामध्ये आडकाठी करण्यात आली. ही बाब योग्य नव्हती. त्यामुळे महामानवाचा अनादर होऊ नये म्हणून १४ एप्रिल या पवित्रदिनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचे आ. राणा म्हणाले.