शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आणि उघडलेच नाही ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान!

By admin | Updated: June 29, 2016 00:11 IST

नेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे.

सामूहिक आत्मघात : अंजनगावात फक्त नि:शब्द उसासे, हादरली अवघी मानवतासंदीप मानकर/चेतन घोगरे अंजनगाव सुर्जीनेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे. पण, मंगळवारी जे घडले ते प्रत्येक संवेदनशील मनाला हादरविणारे होते. एकाच कुटुंबातील दोन पुरूषांसह चार महिलांनी एकाच वेळी अत्याधिक जहाल विषारी औषध प्राशून जीवनयात्रा संपविली. सोमवारी रात्री निजलेले हे कुटुंब मंगळवारी दुपारपर्यंत उठलेच नाही आणि मग उघडकीस आलेले वास्तव हादरवणारे होते. ज्याने-ज्याने पाहिले, ऐकले तो नि:शब्द झाला.अंजनगाव शहरात प्रसिद्ध असलेले ‘बिट्टीबाईचे’ किराणा दुकान. चव्हाण कुटुंबाचे हे दुकान म्हणजेच त्यांचे सर्वस्व. घरातील प्रत्येक कुटुंब या दुकानासाठी झटत असे. नियमित दुकान उघडायचे. रोखीने माल आणायचा आणि रोखीनेच विकायचा, असा या कुटुंबाचा शिरस्ता. प्रफुल्ल नारायणसा चव्हाण (४८), विवेक नारायणसा चव्हाण (४०),परिसरात पेटल्या नाही चुलीअंजनगाव सुर्जी : लक्ष्मी नारायणसा चव्हाण (५०), मंगला नारायणसा चव्हाण (५२) आणि कामिनी अरूणसा बारड (२९), रोशनी अरूणसा बारड (२६) हे या कुटुंबातील सदस्य. सगळेच अविवाहित काही कारणास्तव यांची लग्ने झालीच नाहीत. यापैकी कामिनी ही दररोज सकाळी उठून दुकान उघडायची. दुकानाची झाडपूसही तीच करायची. कामिनी आणि रोशनीची आई उषाबाई बारड यांचे घर त्याच भागात थोड्या अंतरावर आहे. तेथे त्या मुलगा रोशनसह राहतात. परंतु कामिनी आणि रोशनी या आपल्या आत्या-मामांसोबत त्यांच्याच घरी राहायच्या. कामिनी आणि रोशनीचे शिक्षण अवघे दहाव्या इयत्तेपर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले. कामिनी आणि रोशनीचे वडील अरूणसा यांचे आठ-दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मंगळवारी काठीपुरा परिसराला नेहमीप्रमाणे जाग आली. दिनचर्याही नेहमीप्रमाणेच सुरू झाली. पण, ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान काही उघडले नाही. दोन लहान मुली सवयीप्रमाणे दुकानात आल्या. पण, दुकान बंद. त्या परत गेल्यात. दुपारचे दीड वाजले तरी दुकानासह चव्हाण कुटुंबाच्या घरात वर्दळ नव्हती. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. याच भागात चव्हाण कुटुंबाची ८ ते १० घरे आहेत. शेजारीच किशोर चव्हाण राहतात. लोकांनी त्यांच्याकडे शंका व्यक्त केली. त्यांनी नजीकच सावकारपुऱ्यात राहणाऱ्या उषा बारड यांचा मुलगा रोशनला सांगितले. रोशन मामाच्या घरी पोहोचला. त्यानेही बराच वेळ दार ठोठावले. पण, आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस लोकांनी त्याला घरावर चढवून घरात प्रवेश करावयास सांगितले. तो आत गेला आणि आतील दृश्य पाहताच त्याची पाचावर धारण बसली. शेजारी-शेजारी पडलेले आपल्या आत्या-मामांसह सख्ख्या बहिणीचे मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. नागरिकांनाही एव्हाना या भयंकर घटनेची माहिती मिळाली होती. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. अगदी शांतताप्रिय असलेल्या या कुटुंबाने केलेल्या या आत्मघातकी प्रकारामुळे प्रत्येक जण हादरला होता. डोळ्यातील अश्रूही आटले होते. नेमके काय घडले? हेच अनेकांना उमगत नव्हते. असे का व्हावे? हाच सवाल प्रत्येक जण एकमेकांना फक्त डोळ्यांनीच विचारत होता. पोलिसांनी या घटनेच्या कारणमीमांसेकरिता मृत कामिनी आणि रोशनीची आई उषा बारड यांना पोलीस ठाण्यात नेले. मृतांच्या काकू प्रमिला चव्हाण म्हणाल्या ही घटनाच अविश्वसनीय आहे. तर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटूंबाचा हा अंत हादरविणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेमुळे स्तब्ध झालेल्या काठीपुऱ्यासह आसपासच्या भागात मंगळवारी चुली पेटल्या नाहीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते, माजी आमदार अरुण अडसड यांनी या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली.दोन बहिणींचा आधीच झालाय मृत्यूचव्हाण कुटुंबातील नारायणसा चव्हाण यांना तीन मुले आणि सहा मुली. त्यापैकी या घटनेत लक्ष्मी आणि मंगला यांचे निधन झाले. एक बहीण मोर्शीला, एक अंजनगावला तर दोन अंजनगावात राहते. एक मुलगादेखील अमरावतीलाच वास्तव्यास आहे. चार डॉक्टरांनी केले शवविच्छेदन दुपारी ३ वाजता सहा मृतदेह अंजनगावच्या रूग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. तेथे भर पावसात कमांडोंच्या निगराणीखाली सायंकाळी ५.३० वाजता शवविच्छेदनाला सुरूवात झाली. अंजनगावचे वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र सोळंके, चंद्रशेखर पाटील, अमरावती, पूनम मोरे, दर्यापूर, सुशील देशमुख, दर्यापूर या चार डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. ही प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. कृषी केंद्रानजीक प्रफुल्ल दिसल्याची चर्चा सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास मृत प्रफुल्ल नारायणसा चव्हाण हा बसस्थानकानजीकच्या एका कीटकनाशक औषधीच्या दुकानाजवळ फिरताना आढळल्याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती.