शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आश्चर्यच... कापडासाठी ‘बीआयएस’ दर्जा, गणवेशासाठी केवळ तीनशे रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:05 IST

ही तर शिक्षकांचीच परीक्षा, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कसा मिळेल चांगला दर्जाचा गणवेश

- गणेश वासनिक 

अमरावती : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून गणवेश दिला जातो. या गणवेशासाठी लागणारे कापड हे ‘बीआयएस’ दर्जाचे हवे आहे. मात्र, कापड खरेदी व शिवणकामासाठी प्रतिविद्यार्थी केवळ ३०० रुपये खर्च दिला जाणार आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देताना शिक्षकांचीच परीक्षा पाहिली जाणार आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक राजेंद्र पवार यांनी २८ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. गणवेशाचा कापड हा बीआयएस दर्जाप्रमाणे आयएस १५८५२ (२००९), आयएस १५८५३ (२००९) क्रमांकाचा खरेदी करावा लागणार आहे. कापडाच्या दर्जाबाबतची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे. समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दर्जा राखण्यासाठी बीआयएस स्टॅडर्न्ड क्रमांक लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, कापडाचा ‘बीआयएस’ दर्जा अन् ३०० रुपये हे कसे शक्य आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. गणवेशाच्या शिवणकामासाठीच १५० ते २०० रुपये लागत असताना, ‘बीआयएस’ दर्जा कसा राखला जाईल? त्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे का, या विवंचनेत शिक्षक आहेत. 

खुल्या प्रवर्गातील मुले गणवेशापासून वंचितसमग्र शिक्षा अभियानातून शालेय गणवेश हा एससी, एसटी प्रवर्ग आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करून दिला जातो. मात्र, खुला, ओबीसी, एनटी संवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. केवळ मुलींनाच गवणेश दिला जातो. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात अस दुटप्पी धोरण अवलंबविले जात आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना या धोरणाचा फटका बसत आहे.

शासन म्हणते, ४५ रुपयांत गणवेश शिवून घ्या

समग्र शिक्षा अभियानातून प्रतिगणवेश ३०० रुपये खर्च देते. यात कापड खरेदी आणि शिवणकाम खर्चाचा समावेश आहे. मात्र, गणवेश शिवणकामासाठी केवळ ४५ रुपये मंजूर करण्यात आले आहे. वाढत्या महागाईनुसार शिवणकामाचेही दर महागले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा आणि पटसंख्या कायम राहावी,यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक स्थानिक स्तरावर ‘ॲडजस्टमेंट’ करतात, असे चित्र राज्यभर आहे. 

प्रशासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देताना कसरत होते. बरेचदा पालकांचा रोष सहन करावा लागतो. मात्र, मध्यम मार्ग काढताना विद्यार्थ्यांचा कॉन्व्हेंट दर्जा कायम ठेवावा लागतो. शिक्षकांना वर्गणी करून बूट, टाय द्यावा लागतो. ३०० रूपयात गणवेश होत नाही, हे वास्तव आहे.-तुळशीराम धांडे, मुख्याध्यापक, पिंपळखुटा, दर्यापूर पंचायत समिती.