शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म

By admin | Updated: October 14, 2015 00:15 IST

'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले.

संजय बंड यांचा आरोप : 'राणा प्रवृत्ती'चा निषेध, सत्तेसाठी वऱ्हाडे पडले पायाअमरावती : 'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. सहकार पॅनेलला जाऊन मिळाले. राणा-यशोमती ही अभद्र युती जन्माला आली. घोडेबाजाराच्या या 'राणा प्रवृत्ती'चा आम्ही तीव्र निषेध करतो', अशा शब्दांत परिवर्तन पॅनेलचे नेता संजय बंड यांनी सभापती निवडीनंतर लगेचच पत्रपरिषदेत घेऊन संतप्त भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आरोपही केलेत. वऱ्हाडेंना सभापतिपदी विराजमान करणे हा घोडेबाजारात झालेल्या कोट्यवधीच्या उलाढालीचा परिपाक होय, असा थेट आरोपही त्यांनी केला. बाजार समितीवर भगवा फडकू नये, यासाठी राज्यपातळीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती बंड यांनी दिली. न मिळालेले एक मत कुणाचे, याबाबत वऱ्हाडे यांनी संशोधन करावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ज्या नवनियुक्त संचालकांनी कोरी मतपत्रिका टाकून तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचे दाखवून दिले, त्यांचे नाव कळल्यास त्यांचा सत्कार करु आणि आमच्याशी जुळत असल्यास जुळवून घेऊ, असेही संजय बंड म्हणाले. यावेळी मनोज देशमुख, संतोष इंगोेले, भागवतराव खांडे, आशिष धर्माळे, प्रकाश काळबांडे, श्याम देशमुख, नाना नागमोते, उमेश घुरडे, रंगराव बिचुकले, प्रांजली भालेराव, प्रवीण भुगूल हे सात संचालक उपस्थित होते. राणांना बोलण्याचा अधिकार नाहीज्या रवी राणांनी बीएसएनएलची ३० कोटी रुपयांची जागा हडपली त्यांना आम्हाला खंडणीखोर म्हणण्याचा अधिकार नाही, अशी प्रखर टीका करतानाच सत्तेसाठी पाया पडणारे वऱ्हाडे दगाबाज निघाले, अशी तोफही त्यांनी डागली.परिवर्तन पॅनेलमध्ये ज्येष्ठ असताना आणि याआधी तीनदा बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व केले असतानाही सभापती म्हणून मला डावलण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. - सुनील वऱ्हाडे, नवनिर्वाचित सभापती.सहा महिन्यांतच येणार अविश्वासवऱ्हाडेंना सभापतिपदी बसवणे अनेकांना रूचलेले नाही. १८ पैकी एक मत कोरे पडणे, हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या गटात अंतर्गत धुसफूूस आहेच. सहा महिन्यांतच त्यांच्यावर अविश्वास येर्ईल, असा दावा बंड यांनी केला. आम्ही सक्षमपरिवर्तनमधून वऱ्हाडे फुटले असले तरी अन्य ७ संचालक एकत्र आहेत. आम्ही बाजार समितीमध्ये सक्षम विरोधकाची भूमिका वठवू. कुणालाही पैसा खाऊ देणार नाही, असे बंड यांनी ठणकावले. सभापती-उपसभापतिपद अमरावती तालुक्यातील संचालकांना दिले. भरभरुन मते देणाऱ्या भातकुली तालुक्यावर यात अन्याय झाल्याचा आरोपही बंड यांनी केला.