शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बॉयोमेट्रिक बंद, दुरुस्तीला नाही फंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच विभागांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या सुविधेसाठी दोन लाख रुपयांची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली.

ठळक मुद्देझेडपी यंत्रणा कोलमडली : कधी होणार फंड उपलब्ध?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी विविध १४ विभागांसाठी सन २०१४ मध्ये दोन लाख रुपयाची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु, काही वर्षांतच ही बायोमेट्रिक यंत्रणा कुचकामी ठरली आहे. नादुरुस्त असलेली ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे फंडाची तरतूद नसल्याने ही यंत्रणा कोलमडून पडली असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. परिणामी आता फंड केव्हा उपलब्ध होणार आणि बायोमेट्रिक मशीन दुरुस्त केव्हा होणार, हा विषय सध्या तरी अनुत्तरित आहे.सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच विभागांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या सुविधेसाठी दोन लाख रुपयांची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु, ही यंत्रणा अल्पावधीतच बंद पडली आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी आपली कार्यालयीन दैनंदिन हजेरी ही हजेरीपत्रकांवर नोंदवित आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागात लाखो रुपये खर्चून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु, सुरुवातीचा काही महिन्यांचा अपवाद वगळता पुन्हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ही यंत्रणा नादुरुस्त झाली. ती बायोमेट्रिक मशीन काढून दुरुस्तीला पाठविल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, अजूनही ती यंत्रणा कार्यान्वित केली गेली नाही. यामागील कारणांचा मागोवा घेतला असता, बायोमेट्रिक यंत्रणा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निधीची तरतूद नसल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी ही यंत्रणा दुरुस्तीची कामे रखडून पडली आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे सत्ताधारी असलेले पदाधिकारी निधी उपलब्ध केव्हा करून देतील आणि बायोमेट्रिक यंत्रणा दुरुस्त होऊन कर्मचाऱ्यांची लेटलतिफी केव्हा दूर होईल, याचा सध्या तरी अंदाज लागू शकत नाही.‘लेटलतिफी’ सुरूचजिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक यंत्रणाच बंद आहे. त्यामुळे हजरेपत्रकांवर कर्मचारी आपली स्वाक्षरी करून कार्यालयीन उशिरा होणारी उपस्थिती नियमित असल्याचे दर्शवित आहेत.