शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बॉयोमेट्रिक बंद, दुरुस्तीला नाही फंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच विभागांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या सुविधेसाठी दोन लाख रुपयांची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली.

ठळक मुद्देझेडपी यंत्रणा कोलमडली : कधी होणार फंड उपलब्ध?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी विविध १४ विभागांसाठी सन २०१४ मध्ये दोन लाख रुपयाची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु, काही वर्षांतच ही बायोमेट्रिक यंत्रणा कुचकामी ठरली आहे. नादुरुस्त असलेली ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे फंडाची तरतूद नसल्याने ही यंत्रणा कोलमडून पडली असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. परिणामी आता फंड केव्हा उपलब्ध होणार आणि बायोमेट्रिक मशीन दुरुस्त केव्हा होणार, हा विषय सध्या तरी अनुत्तरित आहे.सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, कृषी, शिक्षण आदी विभागांची कार्यालये जिल्हा परिषदेत आहेत. या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मुख्यालयातील सर्वच विभागांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या सुविधेसाठी दोन लाख रुपयांची तरतूद करून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु, ही यंत्रणा अल्पावधीतच बंद पडली आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी आपली कार्यालयीन दैनंदिन हजेरी ही हजेरीपत्रकांवर नोंदवित आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागात लाखो रुपये खर्चून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु, सुरुवातीचा काही महिन्यांचा अपवाद वगळता पुन्हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ही यंत्रणा नादुरुस्त झाली. ती बायोमेट्रिक मशीन काढून दुरुस्तीला पाठविल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, अजूनही ती यंत्रणा कार्यान्वित केली गेली नाही. यामागील कारणांचा मागोवा घेतला असता, बायोमेट्रिक यंत्रणा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निधीची तरतूद नसल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी ही यंत्रणा दुरुस्तीची कामे रखडून पडली आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे सत्ताधारी असलेले पदाधिकारी निधी उपलब्ध केव्हा करून देतील आणि बायोमेट्रिक यंत्रणा दुरुस्त होऊन कर्मचाऱ्यांची लेटलतिफी केव्हा दूर होईल, याचा सध्या तरी अंदाज लागू शकत नाही.‘लेटलतिफी’ सुरूचजिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक यंत्रणाच बंद आहे. त्यामुळे हजरेपत्रकांवर कर्मचारी आपली स्वाक्षरी करून कार्यालयीन उशिरा होणारी उपस्थिती नियमित असल्याचे दर्शवित आहेत.