शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य

By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST

जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर...

चांदूरबाजार : जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संपूर्ण मानव जातीचे भविष्य धोक्यात आले आहे. मानव जातीने पृथ्वीतलावर ताबा केला आहे. भूतलावरील वाढलेली प्राणीमात्रा, वनसंपदा यांचे संवर्धन व संगोपन वेळीच केले नाही तर भविष्यात मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचा इशारा प्र्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूरचे सचिव दिलीपसिंह यांनी केले. स्थानिक आनंद सभागृहात पंचायत समितीतर्फे आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, दिलीप गुजर, वनराई संस्थेचे अध्यक्ष मधुकर घारड, प्राचार्य विजय टोम्पे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून पं.स.चे उपसभापती राजेश सोलव व गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे उपस्थित होते.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा होत असल्याचे सांगून मानवी जीवनही धोक्यात आल्याचे सांगितले. दिलीप गुर्जर आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की वर्ष २००३ मध्ये जैविक विविधता कायदा अमलात आणण्याची गरज पडली. दैनंदिन जीवनातील उपयोगी पडणाऱ्या तुळस, हळद, बासमती तांदुळ, सागरगोटी आदी संपदा वाचविण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम टेकाडे यांनी व संचालन गजानन राऊत यांनी केले. या कार्यशाळेला ग्रा.पं.चे सचिव व सरपंच, पं.स कर्मचारी आदींची उपस्थितीती होती. आभार विस्तार अधिकारी मीना म्हसतकर यांनी मानले.