शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य

By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST

जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर...

चांदूरबाजार : जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संपूर्ण मानव जातीचे भविष्य धोक्यात आले आहे. मानव जातीने पृथ्वीतलावर ताबा केला आहे. भूतलावरील वाढलेली प्राणीमात्रा, वनसंपदा यांचे संवर्धन व संगोपन वेळीच केले नाही तर भविष्यात मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचा इशारा प्र्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूरचे सचिव दिलीपसिंह यांनी केले. स्थानिक आनंद सभागृहात पंचायत समितीतर्फे आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, दिलीप गुजर, वनराई संस्थेचे अध्यक्ष मधुकर घारड, प्राचार्य विजय टोम्पे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून पं.स.चे उपसभापती राजेश सोलव व गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे उपस्थित होते.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा होत असल्याचे सांगून मानवी जीवनही धोक्यात आल्याचे सांगितले. दिलीप गुर्जर आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की वर्ष २००३ मध्ये जैविक विविधता कायदा अमलात आणण्याची गरज पडली. दैनंदिन जीवनातील उपयोगी पडणाऱ्या तुळस, हळद, बासमती तांदुळ, सागरगोटी आदी संपदा वाचविण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम टेकाडे यांनी व संचालन गजानन राऊत यांनी केले. या कार्यशाळेला ग्रा.पं.चे सचिव व सरपंच, पं.स कर्मचारी आदींची उपस्थितीती होती. आभार विस्तार अधिकारी मीना म्हसतकर यांनी मानले.