शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य

By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST

जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर...

चांदूरबाजार : जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संपूर्ण मानव जातीचे भविष्य धोक्यात आले आहे. मानव जातीने पृथ्वीतलावर ताबा केला आहे. भूतलावरील वाढलेली प्राणीमात्रा, वनसंपदा यांचे संवर्धन व संगोपन वेळीच केले नाही तर भविष्यात मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचा इशारा प्र्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूरचे सचिव दिलीपसिंह यांनी केले. स्थानिक आनंद सभागृहात पंचायत समितीतर्फे आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, दिलीप गुजर, वनराई संस्थेचे अध्यक्ष मधुकर घारड, प्राचार्य विजय टोम्पे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून पं.स.चे उपसभापती राजेश सोलव व गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे उपस्थित होते.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा होत असल्याचे सांगून मानवी जीवनही धोक्यात आल्याचे सांगितले. दिलीप गुर्जर आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की वर्ष २००३ मध्ये जैविक विविधता कायदा अमलात आणण्याची गरज पडली. दैनंदिन जीवनातील उपयोगी पडणाऱ्या तुळस, हळद, बासमती तांदुळ, सागरगोटी आदी संपदा वाचविण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम टेकाडे यांनी व संचालन गजानन राऊत यांनी केले. या कार्यशाळेला ग्रा.पं.चे सचिव व सरपंच, पं.स कर्मचारी आदींची उपस्थितीती होती. आभार विस्तार अधिकारी मीना म्हसतकर यांनी मानले.