शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

क्षेत्रीय तपासणी विमा कंपनीला बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांची माहिती : पालकमंत्री, आमदार पोहोचले शेतशिवारात

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने खरिपाची पिके बाधित झाली. नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीकडे आतापर्य$ंत १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत. याव्यतिरिक्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयातदेखील हजारो अर्ज दाखल झालेले आहेत. या सर्व नुकसान सूचना अर्जांची क्षेत्रीय तपासणी बंधनकारक असल्याचे आदेश कृषी आयुक्तांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार ९८९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान हे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या तरतुदीत बसत असल्याने शेतकºयांना पीकविमा योजनेचा लाभ मिळू शकतो. याअनुषंगाने जिल्ह्यात १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज सादर झाले आहेत.हे सर्व अर्ज विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींमार्फत एकत्रित करून संबंधित तालुका कृषी आधिकाºयांच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्तांनी विमा कंपनीला दिले आहेत. ही यादी सर्र्वेक्षण यंत्रणेच्या सुपूर्द करावी, सर्व क्षेत्रीय पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे अधिकारी संबंधित गावांमध्ये उपस्थित राहतील याची खात्री करावी, अन्यथा शासकीय यंत्रणेद्वारा करण्यात आलेले सर्वे ग्राह्य धरावे लागतील, अशी तंबी कृषी आयुक्तांनी दिली आहे.जिल्ह्यात दररोज प्राप्त अर्जांचा अहवाल ठेवण्यात यावा व तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राप्त नुकसान अर्जांची क्षेत्रीय तपासणी करणे बंधनकारक असल्याची तंबी कृषी आयुक्तांनी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिल्याची माहिती आहे.कृषिमंत्र्यांद्वारा बाधित क्षेत्राची पाहणीकृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी रविवारी जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात गोविंदपूर, मोर्शी तालुक्यात काटसूर व अचलपूर तालुक्यात आसेगाव येथील शिवारात जाऊन बाधित पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बच्चू कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.जिल्हा बाधित, जिल्हाधिकारी रजेवरदिवाळीपूर्वी १० दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अशा स्थितीत शासनाच्या माघारी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे आठ दिवसांपासून रजेवर आहेत. याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शनिवारी जिल्हा दौºयावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्याबाबत बैठकीत खडेबोल सुनावले.शनिवारपर्यंत ३४ हजार संयुक्त पंचनामेजिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाधित १.४५ लाख हेक्टरमधील पिकांचे पंचनाम्याची प्रक्रिया युद्धस्तर सुरू आहे. शनिवारपर्यंत अमरावती तालुक्यात ७३५०, भातकुली ५०३२, नांदगाव खंडेश्वर १३३५, चांदूर रेल्वे ६७४, धामणगाव १८९५, तिवसा ११४९, मोर्शी ६३५०, वरुड २५५, अचलपूर ८१७, चांदूर बाजार १२७४, दर्यापूर १३९१, अंजनगाव सुर्जी ७४०, धारणी ३३९० व चिखलदरा तालुक्यात २२९४ अशा एकूण ३३ हजार ९४६ शेतकºयांच्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले.विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभावजिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील खरीप पिके बाधित झाल्यावर नुकसानग्रस्त १६०६ गावांमध्ये कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पथक युद्धस्तरावर सर्वेक्षण करीत आहेत. या पथकांसोबत विमा कंपनीचा प्रतिनिधी असणे महत्त्वाचे आहे. मात्र, विमा कंपनीकडे मनुष्यबळ तोकडे असल्यामुळे संयुक्त पंचनामे ग्राह्य धरून शेकºयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने विमा कंपनीला दिल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBacchu Kaduबच्चू कडू