शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

टंचाई निधीतून भरणार पाणी योजनांची वीज बिले

By admin | Updated: May 31, 2014 23:10 IST

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व

अमरावती : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व कमीत कमी खर्चाच्या उपाययोजना लक्षात घेऊन अशा पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने १५ मे ते १५ जून २0१४ या काळातील वीज देयक टंचाई निधीतून देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. टँकरच्या खर्चात बचत होईल, अशाच ठिकाणी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याने अधिकार्‍यांना अशा योजना अभ्यास करून शोधाव्या लागणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असेल त्या वाड्या-वस्त्यांवर तत्काळ मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना येत्या ३0 जूनपर्यंत दिले आहेत. तसेच पाणी योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करताना टँकरवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. टँकरवर खर्च होणारा हाच पैसा पाणी योजनांची थकित बिले देण्यात घालवला तर निदान टंचाईच्या काळात तरी या समस्येची तीव्रता कमी होणार आहे. यासाठी टँकरच्या खर्चात खरच बचत होईल असाच टंचाईचा परिसर अधिकार्‍यांना शोधावा लागणार आहे. याठिकाणी अस्तित्वात असणार्‍या पाणी योजनांची चालू महिन्याची वीज बिले टंचाई निधीतून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रोहयोंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींचा केवळ पेयजलासाठीच वापर होत असेल. अशा विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी होणारा खर्चही पाणीटंचाई निधीतून भागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या निर्णयामुळे पाणी टंचाईच्या विजदेयका अभावी बंद पडलेल्या योजनांना दिलासा मिळणार आहे.  (प्रतिनिधी)