शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

टंचाई निधीतून भरणार पाणी योजनांची वीज बिले

By admin | Updated: May 31, 2014 23:10 IST

राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व

अमरावती : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व कमीत कमी खर्चाच्या उपाययोजना लक्षात घेऊन अशा पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने १५ मे ते १५ जून २0१४ या काळातील वीज देयक टंचाई निधीतून देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. टँकरच्या खर्चात बचत होईल, अशाच ठिकाणी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याने अधिकार्‍यांना अशा योजना अभ्यास करून शोधाव्या लागणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असेल त्या वाड्या-वस्त्यांवर तत्काळ मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना येत्या ३0 जूनपर्यंत दिले आहेत. तसेच पाणी योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करताना टँकरवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. टँकरवर खर्च होणारा हाच पैसा पाणी योजनांची थकित बिले देण्यात घालवला तर निदान टंचाईच्या काळात तरी या समस्येची तीव्रता कमी होणार आहे. यासाठी टँकरच्या खर्चात खरच बचत होईल असाच टंचाईचा परिसर अधिकार्‍यांना शोधावा लागणार आहे. याठिकाणी अस्तित्वात असणार्‍या पाणी योजनांची चालू महिन्याची वीज बिले टंचाई निधीतून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रोहयोंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींचा केवळ पेयजलासाठीच वापर होत असेल. अशा विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी होणारा खर्चही पाणीटंचाई निधीतून भागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या निर्णयामुळे पाणी टंचाईच्या विजदेयका अभावी बंद पडलेल्या योजनांना दिलासा मिळणार आहे.  (प्रतिनिधी)