शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधीचे पाईप पडून; अचलपूर नगरपालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 11:58 IST

Amravati News चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो पाईप दहा वर्षांपासून पडून आहेत. अचलपूर नगर परिषदेकडून दुर्लक्षित हे पाईप कल्याण मंडपम् परिसरात ठेवण्यात आले आहेत.

अमरावती: चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो पाईप दहा वर्षांपासून पडून आहेत. अचलपूर नगर परिषदेकडून दुर्लक्षित हे पाईप कल्याण मंडपम् परिसरात ठेवण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७-०८ मध्ये अचलपूर-परतवाडा शहराकरिता चंद्रभागा धरणावरील वाढीव पाणीपुरवठा योजना मान्य केली गेली. ४० कोटींची ही योजना पुढे ७० कोटींवर पोहोचली. या योजनेंतर्गत जिंदल सॉ.लि. कडून २००८-०९ मध्ये मोठ्या प्रमाणात पाईप खरेदी केली गेली. याकरिता अचलपूर नगर परिषदेकडून महाराष्ट्र बँकमार्फत दहा कोटींचे लेटर ऑफ क्रेडिटही प्रदान केले गेले. यादरम्यान नियोजनानुसार न घेता, जादा पाईप खरेदी केले गेले. हे अनावश्यक कोट्यवधीचे पाईप दहा वर्षांनंतर आजही शहरात बघायला मिळत आहेत. यातील काही पाईप कल्याण मंडपम् बाहेर बेवारस स्थितीत पडून आहेत. यातील काही पाईप चोरीला गेल्याचे, काहींनी पळवून नेल्याचे वृत्त आहे.

कोट्यवधीचे शेकडो पाईप १० वर्षांपासून पडून असतानाच चार वर्षांपूर्वी अचलपूर-परतवाडा शहराकरिता अमृत योजना मंजूर केली गेली. यात शहरात नव्याने पाईपचे जाळे अंथरले गेले. नवीन पाईप खरेदी केले गेले. कोट्यवधीचा खर्च अमृत योजनेंतर्गत अचलपूर नगरपालिकेकडून केला गेला. ही अमृतची पाईप लाईनही शहरवासीयांना योग्य पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. कामाच्या दर्जावर नागरिकांसह नगरसेवकांचा आक्षेप आहे. जवळपास बारा वर्षांत दोन पाणीपुरवठा योजना आणि चंद्रभागा धरणातील भूपृष्ठावरील खात्रीचा स्रोत उपलब्ध झाला असूनही जुळ्या शहरातील जलसंकटावर नगर परिषदेला मात करता आलेली नाही. आजही ट्यूबवेलच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी या ट्यूबवेल, बोअरवेल पाणीपुरवठ्याच्या पाईपला जोडल्या आहेत.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील कोलमडलेल्या पाणी वितरण व्यवस्थेचे, ‘अमृत’च्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहा महिन्यांपूर्वी दिले. पण, या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. ही चौकशीच नगर परिषदेने गुंडाळून ठेवली आहे. यादरम्यान दहा वर्षांपासून धूळखात पडलेले कोट्यवधीचे शेकडो पाईप नव्याने चर्चेत आले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार