शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दुरुस्ती सुचविणाऱ्या विधेयकाची होळी

By admin | Updated: April 22, 2017 00:24 IST

संसदेसमोर येऊ घातलेल्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरुस्ती सुचविणाऱ्या काही तरतुदींना जिल्ह्यातील वकील संघाने

जिल्हा वकील संघाकडून निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : संसदेसमोर येऊ घातलेल्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरुस्ती सुचविणाऱ्या काही तरतुदींना जिल्ह्यातील वकील संघाने जोरदार विरोध केला आहे. राष्ट्रीय विधी आयोगाने अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये काही दुरुस्ती सुचवून ते विधेयक संसदेकडे मान्यतेसाठी पाठविले आहे. ते दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात येऊ नये, यासाठी वकील संघाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाज अर्धा दिवस बंद ठेवून विधेयकाच्या प्रती जाळून निषेध नोंदविला. यासंदर्भात अमरावती जिल्हा वकील संघाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. या दुरुस्ती विधेयकामध्ये वकिलांवर अन्यायकारक, जाचक अशा अटी लादण्यात आल्याचा आरोप वकील संघाने केला आहे. सुधारणा सुचविणारे हे विधेयक लोकशाहीविरोधी आणि वकीलविरोधी आणि असंवैधानिक असल्याचा आरोपही वकील संघाने केला आहे. वकिलांविरुध्द प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात सद्याच्या कायद्यामध्ये बार काऊंसील आॅफ इंडियाच्या सदस्यांची चौकशी समिती नेमून त्याद्वारे प्रकरण चालविली जातात. मात्र, या दुरुस्ती विधेयकात आमुलाग्र बदल करून या समितीत अन्य तीन सदस्य घेण्याची तरतुद करण्यात आली आहे. ग्राहक न्यायालय न्यायालयीन कक्षात आणण्याची शिफारस यात नमुद आहे. विधेयकानुसार वकीलाविरोधात पक्षकार व न्यायाधीश तक्रार करू शकतात, यात वकिलांचा दोष सिद्ध झाल्यास त्यांना ५ लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल. या व अशा शिफारसी संसदेत मांडण्यात येऊ नये, याकरिता निषेध नोंदविण्यात आला. २ मे पर्यंत शासनाने कारवाई न केल्यास देशभरातील वकील संघाचे पदाधिकारी दिल्लीत धरणे देणार आहे. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास राज्य व जिल्हा स्तरावर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा वकील संघाने प्रशासनाला दिला आहे. निवेदनदेतेवेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्या नेतृत्वात वकील संघाचे सदस्य, महिला वकिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. (प्रतिनिधी)