शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

अमरावती बाजार समितीत 'बिहारी राज'

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत.

नियमांना खो : जिल्हाधिकारी, पालकमंत्री करणार का चौकशी? अमरावती : तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांवर नियमांचा हातोडा हाणणाऱ्या बाजार समितीच्या बिहारीप्रेमाविरुद्ध एल्गार छेडण्याच्या तयारीत मराठी मजूर आहे. तसा इशाराच त्यांनी दिला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास वातावरण वेळीच शांत होऊ शकेल.मराठमोळ्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बाजार समितीत धान्याची मोठी उलाढाल होते. पोत्यात धान्य भरणे, पोती वाहून नेणे, पोती मालमोटारीत भरणे या स्वरुपाच्या कामांसाठी मजुरांची गरज भासते. ही कामे करण्यासाठी ४०० ते ५०० मजुरांना बाजार समितीने परवाने देऊन अधिकृत केले आहे. नियमानुसार, परवाने असलेला मजूरच बाजार समितीच्या आवारात प्रवेश करू शकतो, काम करू शकतो. परवाने नसलेले; पण गरज असलेले मराठी मजूर बाजार समितीत काम करू शकत नाहीत. मराठी मजुरांसाठी नियम असा काटेकोर असताना बाजार समितीच्या आवारात बिहारहून मुद्दामच आणले गेलेले सुमारे सव्वाशे मजूर नियमबाह्यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांच्या हक्काचा घास हिरावणाऱ्या या परप्रांतिय मजुरांसाठी बाजार समितीने सारेच नियम का गुंडाळून ठेवले, असा सवाल मराठी मजुरांचा आहे. बिहारी मजुरांना बळअमरावती : बाजार समितीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बिहारहून मजुरांना आणले आहे. व्यापाऱ्यांच्या निमंत्रणानुसार टोळीने हे मजूर बाजार समितीच्या आवारात दाखल होतात. मराठी मजूर करतात त्याच मालमोटरी भरण्याच्या कामी त्यांना जुंपले जाते. मराठी मजुरांच्या हक्कावर त्यामुळे गदा आली आहे. हल्ली बाजार समितीत धान्याची आवक अल्न असल्यामुळे मराठी मजुरांच्या हाताला काम नाही. अशा बिकट स्थितीतही बाजार समितीत 'बिहारी राज' असल्यामुळे मराठी मजूर जाम संतापला आहे. मजूर आम्ही आणलेले नाहीत. आम्ही त्यांना परवानेही दिलेले नाहीत, अशी भूमिका घेऊन बाजार समिती व्यापाऱ्यांकडे अंगुलिनिर्देश करतात. तथापि, बिहारचे मजूर मराठी मजूर करतात तेच काम करीत असतील तर त्यांना आणले कुणी हा मुद्दाच गौण ठरतो. व्यापाऱ्यांनी मजूर आणले हे बाजार समितीला मान्य असेल तर व्यापाऱ्यांना मजूर आणता येतात काय? विनापरवाना मजुरांना बाजार समितीत काम करता येते काय? बिहारी मजुरांना अशी मुभा दिली जात असेल तर मराठी मजुरांनाच नियमांच्या बेड्या का? परवाने कशासाठी, या प्रश्नांचे उत्तर बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी द्यावे, अशी अपेक्षा मराठी मजुरांची आहे.