शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भूमिपूजनास दांडी, अभियंत्याला 'शो कॉज'

By admin | Updated: May 13, 2015 23:59 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी ....

स्थायी समिती सभा : पदाधिकाऱ्यांचे अवमान केल्याप्रकरणी निषेध अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार ९ मे रोजी पोहोचले. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याने पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय असे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याचा निषेधही जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला आहे. लोहगाव येथे गावतलाव दुरुस्तीचे सुमारे ५५ लक्ष रुपयांचे काम जिल्हा परिषदेने मंजूर केले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी ९ मे रोजी आयोजित करण्याबाबत सिंचन विभागाला लेखी स्वरुपात कळविले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषदचे सदस्य भूमिपूजन स्थळी पोहचले. मात्र या कार्यक्रमाचे नियोजित ठरलेले धोरण बाजूला सारत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटदुखे व अन्य अधिकारी नियोजित ठिकाणी पोहचले नाही. दरम्यान भूमिपूजन सोहळ्याला मला यायचे असल्याचा मोबाईलवर निरोप कार्यकारी अभियंता पोटदुखे यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून मिळाला असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. परंतु पालकमंत्र्यांच्या या निरोपाबरोबर साधी कल्पनाही अध्यक्ष व उपस्थित लोकप्रनिधींना देण्यात आली नाही. त्यामुळे भूमिपूजनासाठी पोहोचलेले लोकप्रतिनिधी अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ताटकळत बसले होते. दरम्यान हा मुद्दा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करीत सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व आमदारांचा तसेच सभागृहाचा अवामान केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सभागृहात केली. यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. याशिवाय बांधकाम विभागाचे दर्यापूर येथील उपअभियंता ठाकरे यांनी ज्या कंत्राटदारांची कामे निकृष्ट असल्याने सांगितले होते, त्याच अभियंताने काही दिवसांत ही कामे चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र आता देयके काढण्यास कुचराई करीत आहेत. पैसे घेऊनही अधिकारी असे कृत्य करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भातही चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांना देण्यात आले आहे. यावेळी इतरही विषयांवर सभेत चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे, सीईओ अनिल भंडारी, डेप्युटी सीईओ के.एम. अहमद, जे.एम. आभाळे, खातेप्रुख पी.जी. भागवत, श्वेता बॅनर्जी, एस.एम: पानझाडे, चंद्रशेखर खंडारे, सी.आर. राठोड, उदय काठोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)