शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भूमिपूजनास दांडी, अभियंत्याला 'शो कॉज'

By admin | Updated: May 13, 2015 23:59 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी ....

स्थायी समिती सभा : पदाधिकाऱ्यांचे अवमान केल्याप्रकरणी निषेध अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार ९ मे रोजी पोहोचले. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याने पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय असे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याचा निषेधही जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला आहे. लोहगाव येथे गावतलाव दुरुस्तीचे सुमारे ५५ लक्ष रुपयांचे काम जिल्हा परिषदेने मंजूर केले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी ९ मे रोजी आयोजित करण्याबाबत सिंचन विभागाला लेखी स्वरुपात कळविले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषदचे सदस्य भूमिपूजन स्थळी पोहचले. मात्र या कार्यक्रमाचे नियोजित ठरलेले धोरण बाजूला सारत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटदुखे व अन्य अधिकारी नियोजित ठिकाणी पोहचले नाही. दरम्यान भूमिपूजन सोहळ्याला मला यायचे असल्याचा मोबाईलवर निरोप कार्यकारी अभियंता पोटदुखे यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून मिळाला असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. परंतु पालकमंत्र्यांच्या या निरोपाबरोबर साधी कल्पनाही अध्यक्ष व उपस्थित लोकप्रनिधींना देण्यात आली नाही. त्यामुळे भूमिपूजनासाठी पोहोचलेले लोकप्रतिनिधी अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ताटकळत बसले होते. दरम्यान हा मुद्दा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करीत सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व आमदारांचा तसेच सभागृहाचा अवामान केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सभागृहात केली. यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. याशिवाय बांधकाम विभागाचे दर्यापूर येथील उपअभियंता ठाकरे यांनी ज्या कंत्राटदारांची कामे निकृष्ट असल्याने सांगितले होते, त्याच अभियंताने काही दिवसांत ही कामे चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र आता देयके काढण्यास कुचराई करीत आहेत. पैसे घेऊनही अधिकारी असे कृत्य करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भातही चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांना देण्यात आले आहे. यावेळी इतरही विषयांवर सभेत चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे, सीईओ अनिल भंडारी, डेप्युटी सीईओ के.एम. अहमद, जे.एम. आभाळे, खातेप्रुख पी.जी. भागवत, श्वेता बॅनर्जी, एस.एम: पानझाडे, चंद्रशेखर खंडारे, सी.आर. राठोड, उदय काठोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)