शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे...!

By admin | Published: June 29, 2014 11:40 PM

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला.

वारकऱ्यांचे माऊलीला साकडे : पावसाची दडी, शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवातअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदा पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात अन् वारी करून आल्यावर पीक हे चांगलंच वर आलेलं असतं. तेव्हा डवरणी, निंदण आदी सोपस्कार आटोपतात. परंतु यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी निघाले आहे.नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे।भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।या काव्यात टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करीत शेतकरी, वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत. माऊलीची दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी पावसासाठी आर्जव करू लागला आहे. २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी ७०,२०,२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३,७३,००० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. कपाशीसाठी १,५९,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर कपाशी व सोयाबीनची पेरणी होणार आहे. तसे पाहता विदर्भातील खरिपाची पेरणी २० ते २५ जून दरम्यान दरवर्षी संपुष्टात येते अन् शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. यंदा मात्र चित्र उलट आहे. जिल्ह्यात केवळ ४० मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.