शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

भाऊसाहेब म्हणाले, ‘बलराम तूच सांभाळ’!

By admin | Updated: February 4, 2016 00:16 IST

देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले.

बलराम जाखडांचा ऋणानुबंध : ‘भारत कृषक समाज’ची सोपविली सूत्रेलोकमत विशेषअमरावती : देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बलराम जाखड यांच्या हाती भारत कृषक समाजाची सूत्रे मोठ्या विश्वासाने सोपविली होती. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या विचारांना अनुसरूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य आहे, असे विचार उघडपणे मांडणारे बलराम जाखड दोन वेळा अंबानगरीत आले. मात्र, सन २००३ सालची त्यांची अमरावतीला दिलेली भेट शेवटची ठरली. भारत कृषक समाजाचा विदर्भव्यापी मेळावा स्थानिक सांस्कृतिक भवनात २ आॅक्टोबर २००३ साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दलचा अत्यांतिक आदर आणि जिव्हाळा यावेळी त्यांच्या भाषणातून झळकत होता. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातही उपस्थितीअमरावती : डॉ. भाऊसाहेबांनी भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले. मात्र, अंतिम समयी त्यांनी समाजाची सूत्रे ‘बलराम तू सांभाळ’ असे सांगत जाखड यांच्या स्वाधिन केली होती. या मेळाव्यात खुद्द बलराम जाखड यांनी हा प्रसंग सांगितला होता. याचवेळी आयोजित कार्यक्रमात जाखड यांनी पंचवटी चौकातील डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यपाल प्रभा राव, सुरेंद्र भुयार, अण्णासाहेब वाटाणे, भारत कृषक समाजचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते. त्यांची ही अमरावती भेट शेवटची ठरली. बलराम जाखड यांचा डॉ. भाऊसाहेब देशमुखांमुळे अंबानगरीशी एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतून तो त्यांनी जपला. सन १९९८ साली डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यालाही बलराम जाखड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला शरद पवार, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव यांचीही उपस्थिती होेती.