शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

भाऊसाहेब म्हणाले, ‘बलराम तूच सांभाळ’!

By admin | Updated: February 4, 2016 00:16 IST

देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले.

बलराम जाखडांचा ऋणानुबंध : ‘भारत कृषक समाज’ची सोपविली सूत्रेलोकमत विशेषअमरावती : देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बलराम जाखड यांच्या हाती भारत कृषक समाजाची सूत्रे मोठ्या विश्वासाने सोपविली होती. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या विचारांना अनुसरूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य आहे, असे विचार उघडपणे मांडणारे बलराम जाखड दोन वेळा अंबानगरीत आले. मात्र, सन २००३ सालची त्यांची अमरावतीला दिलेली भेट शेवटची ठरली. भारत कृषक समाजाचा विदर्भव्यापी मेळावा स्थानिक सांस्कृतिक भवनात २ आॅक्टोबर २००३ साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दलचा अत्यांतिक आदर आणि जिव्हाळा यावेळी त्यांच्या भाषणातून झळकत होता. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातही उपस्थितीअमरावती : डॉ. भाऊसाहेबांनी भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले. मात्र, अंतिम समयी त्यांनी समाजाची सूत्रे ‘बलराम तू सांभाळ’ असे सांगत जाखड यांच्या स्वाधिन केली होती. या मेळाव्यात खुद्द बलराम जाखड यांनी हा प्रसंग सांगितला होता. याचवेळी आयोजित कार्यक्रमात जाखड यांनी पंचवटी चौकातील डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यपाल प्रभा राव, सुरेंद्र भुयार, अण्णासाहेब वाटाणे, भारत कृषक समाजचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते. त्यांची ही अमरावती भेट शेवटची ठरली. बलराम जाखड यांचा डॉ. भाऊसाहेब देशमुखांमुळे अंबानगरीशी एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतून तो त्यांनी जपला. सन १९९८ साली डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यालाही बलराम जाखड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला शरद पवार, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव यांचीही उपस्थिती होेती.