शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब म्हणाले, ‘बलराम तूच सांभाळ’!

By admin | Updated: February 4, 2016 00:16 IST

देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले.

बलराम जाखडांचा ऋणानुबंध : ‘भारत कृषक समाज’ची सोपविली सूत्रेलोकमत विशेषअमरावती : देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बलराम जाखड यांच्या हाती भारत कृषक समाजाची सूत्रे मोठ्या विश्वासाने सोपविली होती. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या विचारांना अनुसरूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य आहे, असे विचार उघडपणे मांडणारे बलराम जाखड दोन वेळा अंबानगरीत आले. मात्र, सन २००३ सालची त्यांची अमरावतीला दिलेली भेट शेवटची ठरली. भारत कृषक समाजाचा विदर्भव्यापी मेळावा स्थानिक सांस्कृतिक भवनात २ आॅक्टोबर २००३ साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दलचा अत्यांतिक आदर आणि जिव्हाळा यावेळी त्यांच्या भाषणातून झळकत होता. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातही उपस्थितीअमरावती : डॉ. भाऊसाहेबांनी भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले. मात्र, अंतिम समयी त्यांनी समाजाची सूत्रे ‘बलराम तू सांभाळ’ असे सांगत जाखड यांच्या स्वाधिन केली होती. या मेळाव्यात खुद्द बलराम जाखड यांनी हा प्रसंग सांगितला होता. याचवेळी आयोजित कार्यक्रमात जाखड यांनी पंचवटी चौकातील डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यपाल प्रभा राव, सुरेंद्र भुयार, अण्णासाहेब वाटाणे, भारत कृषक समाजचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते. त्यांची ही अमरावती भेट शेवटची ठरली. बलराम जाखड यांचा डॉ. भाऊसाहेब देशमुखांमुळे अंबानगरीशी एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतून तो त्यांनी जपला. सन १९९८ साली डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यालाही बलराम जाखड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला शरद पवार, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव यांचीही उपस्थिती होेती.