शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

खबरदार! जंगलात पार्ट्या कराल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:29 IST

वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकायदेशीर कारवाईचे झळकले फलक

अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.वडाळी वनपरिक्षेत्राचा दर्जा राखीव वनात असून, हे जंगल वन्यजीवाचे आश्रयस्थान आहे. या जंगलात बिबट, रानडुक्कर, नीलगाय, चितळ, मोर आदी वन्यजीवांसह जंगलाचा राजा वाघसुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे जंगलात मानवी हस्तक्षेप धोकादायक ठरू शकते. मानव व वन्यप्राणी संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत वडाळी वनपरिक्षेत्रात छत्री तलाव मार्गावरील जंगलात मद्यपी पार्ट्या करताना आढळले. पार्ट्या करणारे जंगलात कचरा व घाण करून ठेवत असल्यामुळे वन्यजीवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जंगलातील काही ठिकाणी मद्याच्या बॉटल्स व पाणी पाऊच आढळल्याचे काही प्रकार पुढे आले. याविषयी गंभीर दखल घेत उपवनसरंक्षक गजेन्द्र नरवणे यांनी घेतली. विनापरवानगी जंगलात जाल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.- तर होईल दखलपात्र वनगुन्हाविनापरवानगी जंगलात फिरायला जाणे, पार्टी करणे, आगी लावणे, धूम्रपान अथवा मद्यपान करणे, वृक्षतोड करणे, वन्यजीवाला त्रास व ईजा होईल, असे कोणतेही कृत्य दखलपात्र वनगुन्हा ठरते. जर वनविभागाने दिलेल्या सूचनांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ चे विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.छत्री तलाव मार्गालगतच्या जंगलात मद्यपींच्या पार्ट्या चालत असल्याचा प्रकार तेथील मद्याच्या बॉटलवरून लक्षात येत आहे. जंगलात पार्ट्या करणे गुन्हा ठरतो. त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो. त्यामुळे सूचना फलक लावून कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहे.- गजेंद्र नरवणे, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग