शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सोशल मीडियावरील फेक न्यूजपासून सावधगिरी बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या पूर्णपणे सुरक्षित अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या पूर्णपणे सुरक्षित

अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूजद्वारे भीती आणि दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अशा फेक न्यूजपासून सावधगिरी बाळगावी. वृत्तपत्र, दुधाच्या पिशव्या अथवा पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे हे कोरोना संसर्गाचा प्रसार करीत नसून, ती सर्व सुरक्षित असल्याची बाब जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली.

१ मेपासून १५ दिवसांसाठी नव्याने संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान ३० एप्रिल रोजी सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करण्यात आली. यात जिल्हा प्रशासनाचा उल्लेख करण्यात आला आहे. शेजारी जाणे बंद करा, गरम पाणी प्या, ब्रेड, पाव असे बेकरी साहित्य आणू नका, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नका, असा संदेश व्हायरल करण्यात आला; मात्र राज्य शासनाने लॉकडाऊनसाठी नव्याने नियमावली जारी केलेली नाही. नागरिकांची गैरसाेय अथवा दहशत निर्माण होईल अशी बंधने लादण्यात आली नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजता दरम्यान सूट देण्यात आली आहे. औषध, दवाखाने, बँक, पोस्ट, पेट्रोल पंप, ॲम्ब्युलन्स आदी अतिआवश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असून, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोट

कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये. कोरोना नियमावलींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.