शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या पश्चात पालकांनाही मिळणार निवृत्ती वेतनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:06 IST

शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे.

कुटुंब संज्ञेचा विस्तार : महिलांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन अमरावती : शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे. यात एकट्या असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पालकाचाही समावेश केल्यामुळे सवेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर किंवा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांनाही आता निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई, वडिलांना किंवा त्याच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्यांना पेन्शन मिळत नव्हती. मात्र या निर्णयामुळे जिल्हा परिषदेपासून ते मंत्रालय स्तरावरील सर्वच शासकीय परंतु एकट्या कर्मचाऱ्यांना आई-वडिलांचे काय होणार, याची चिंंता राहणार नाही. या योजनेअंतर्गत एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांना आई-वडिलांना हयात असेपर्यंत पेन्शन मिळणार आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना तिचे समाजातील स्थान कायम राहील, तिच्या हक्काची जपणूक होईल.तिचे आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल.या दृष्टीने शासनाने विधवांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नुसार विधवा महिलांनी पुनर्विवाह केल्यास त्यांना त्यांच्या दिवंगत पतीच्या शासकीय सेवेचा लाभ घेता येत नव्हता. परंतु ११ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार विधवा महिला जर आयुष्यात पुन्हा उभी राहू इच्छित असेल तर या विधवा महिलांना पुनर्विवाह केल्यानंतरही तिची पेंशन सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)पाल्याच्या पश्चात् मिळणार निवृत्ती वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ अंतर्गत सेवेत असतांना अथवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास चरितार्थाचे साधन नसल्याने एकट्या असलेल्या त्याच्या किंवा तिच्यावर अवलंबून असलेल्या पालक किंवा कुटुंबातील सदस्य निवृत्ती वेतनास पात्र धरल्या जात नसे, परंतु सामाजिक सुरक्षेचा विचार करून या नियमात बदल करत राज्य शासनाने मुलगा अथवा मुलगी असा भेद न करता एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब अस्तित्वात नसेल आणि पालक पूर्णत: आपल्या पाल्यावर अवलंबून असतील तर त्यांना पाल्याच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय २२ जानेवारी २०१५ ला शासनाने घेतला आहे. अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना प्रवास सवलतीचा लाभशासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांना स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शन रजा मंजूर आहे. यात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. या नियमातही आता बदल करण्यात आला आहे. अविवाहित महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणारे आई-वडील, बहीण व भाऊ यांनादेखील या प्रवास सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.