शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

कर्मचाऱ्यांच्या पश्चात पालकांनाही मिळणार निवृत्ती वेतनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:06 IST

शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे.

कुटुंब संज्ञेचा विस्तार : महिलांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन अमरावती : शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे. यात एकट्या असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पालकाचाही समावेश केल्यामुळे सवेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर किंवा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांनाही आता निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई, वडिलांना किंवा त्याच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्यांना पेन्शन मिळत नव्हती. मात्र या निर्णयामुळे जिल्हा परिषदेपासून ते मंत्रालय स्तरावरील सर्वच शासकीय परंतु एकट्या कर्मचाऱ्यांना आई-वडिलांचे काय होणार, याची चिंंता राहणार नाही. या योजनेअंतर्गत एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांना आई-वडिलांना हयात असेपर्यंत पेन्शन मिळणार आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना तिचे समाजातील स्थान कायम राहील, तिच्या हक्काची जपणूक होईल.तिचे आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल.या दृष्टीने शासनाने विधवांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नुसार विधवा महिलांनी पुनर्विवाह केल्यास त्यांना त्यांच्या दिवंगत पतीच्या शासकीय सेवेचा लाभ घेता येत नव्हता. परंतु ११ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार विधवा महिला जर आयुष्यात पुन्हा उभी राहू इच्छित असेल तर या विधवा महिलांना पुनर्विवाह केल्यानंतरही तिची पेंशन सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)पाल्याच्या पश्चात् मिळणार निवृत्ती वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ अंतर्गत सेवेत असतांना अथवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास चरितार्थाचे साधन नसल्याने एकट्या असलेल्या त्याच्या किंवा तिच्यावर अवलंबून असलेल्या पालक किंवा कुटुंबातील सदस्य निवृत्ती वेतनास पात्र धरल्या जात नसे, परंतु सामाजिक सुरक्षेचा विचार करून या नियमात बदल करत राज्य शासनाने मुलगा अथवा मुलगी असा भेद न करता एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब अस्तित्वात नसेल आणि पालक पूर्णत: आपल्या पाल्यावर अवलंबून असतील तर त्यांना पाल्याच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय २२ जानेवारी २०१५ ला शासनाने घेतला आहे. अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना प्रवास सवलतीचा लाभशासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांना स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शन रजा मंजूर आहे. यात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. या नियमातही आता बदल करण्यात आला आहे. अविवाहित महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणारे आई-वडील, बहीण व भाऊ यांनादेखील या प्रवास सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.