शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ

By admin | Updated: June 25, 2015 00:09 IST

शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट....

अपडेट माहिती : कृषी विभाग करणार दररोज मार्गदर्शनधामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर असून पुढच्या सात दिवसांत या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर कृषी सहायकांना घ्यावे लागणार आहेत.शेतकऱ्यांना शेती संदर्भात वेळोवेळी माहिती उपलब्ध व्हावी, दरवर्षी शेतात होणाऱ्या उत्पन्नात भर पडावी, कोणते बियाणे शेतात पेरावे, किती दिवसानंतर खते द्यावीत कीड संरक्षणाचा उपाय याविषयीची माहिती आता शेतकऱ्यांना दररोज मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ त्या संदर्भात कृृषी विभागाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागात कृषी सहायकांची बैठक घेऊन किसान एसएमएस योजनेकरिता शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेण्याचे आदेश दिले आहेत. यात शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, घेत असलेली पिके अशी विविध माहिती अर्जामध्ये नमूद क रून कृषी विभागाला सादर करावयाची आहे़ विशेषत: शेतकऱ्यांना शेती संदर्भात एखादी माहिती गरजेची असल्यास कृषी विभागाचा ‘व्हॉटस् अ‍ॅप’ नंबरही राहणार आहे़ याद्वारे शेतकऱ्यांना त्वरित सर्व माहिती मिळणार आहे़ ३० जूनपर्यंत दीड लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅन लाईन करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची दररोज माहिती मिळावी या उद्देशाने ‘किसान एसएमएस’ योजनेसाठी शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅनलाईन करावयाचा आहे़ याविषयी कृषी सहायक ांची बैठक घेऊन निर्देश दिले आहेत़ -अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारीप्रत्येक शेतकऱ्याची माहिती अपडेट करणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक कृषी सहायकाकडे देऊन ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ घ्यावा-गोरख वावरे, अध्यक्ष, कृषी सहायक संघटना