शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

३० मीटर अंतरातील वीज जोडण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना ...

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसांत कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०’ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात राबविणे सुरू आहे.

१ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपासाठी महावितरणकडे या अगोदर कोणतीच योजना कार्यरत नसल्याने राज्यात कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनात नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणानुसार ज्या नवीन कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे, अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देणे, लघुदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नवीन कृषिपंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे काही अटींवर तीन महिन्यांच्या आत वीज जोडणी देण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नवीन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे व ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पद्धतीने सौरकृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे. ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि नवीन वीज जोडणीचा लाभ मिळालेल्या यामध्ये अमरावती जिल्ह्यांतर्गत महावितरण अचलपूर विभागातील २५, अमरावती ग्रामीण विभागातील १२४, मोर्शी विभागातील ९८ आणि अमरावती शहर विभागातील २ अशा एकूण २४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणच्या यवतमाळ विभागात १२३, पुसद विभाग ११६ आणि पांढरकवढा विभागात १३८ असे एकूण ३७७ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.