शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

३० मीटर अंतरातील वीज जोडण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना ...

अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसांत कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०’ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात राबविणे सुरू आहे.

१ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपासाठी महावितरणकडे या अगोदर कोणतीच योजना कार्यरत नसल्याने राज्यात कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनात नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणानुसार ज्या नवीन कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे, अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देणे, लघुदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नवीन कृषिपंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे काही अटींवर तीन महिन्यांच्या आत वीज जोडणी देण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नवीन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे व ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पद्धतीने सौरकृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे. ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि नवीन वीज जोडणीचा लाभ मिळालेल्या यामध्ये अमरावती जिल्ह्यांतर्गत महावितरण अचलपूर विभागातील २५, अमरावती ग्रामीण विभागातील १२४, मोर्शी विभागातील ९८ आणि अमरावती शहर विभागातील २ अशा एकूण २४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणच्या यवतमाळ विभागात १२३, पुसद विभाग ११६ आणि पांढरकवढा विभागात १३८ असे एकूण ३७७ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.