शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:01 IST

संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देपोर्टेबिलिटीद्वारा पुरवठा : धान्य देण्याच्या दुकानदारांना सूचना, दरमहा २० हजारांवर लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात 'वन नेशन वन रेशन'ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे. सदरची योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दरमहा २० हजारांवर लाभार्थ्यांना या प्रणालीव्दारे लाभ दिला जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांिगतले.असे आहे कार्डनिहाय वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो मोफत तूर किंवा चना डाळ देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात एप्रिल मे व जून या तीन महिन्यासाठी प्रतिमहिना १७८ मेट्रिकटन तूरडाळ व २६७ टन चणाडाळ उपलब्ध झाली आहे. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रतिकार्ड १५ किलो गहू, ३ रुपये किलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्डावर २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदळाचे वितरित केले जात आहे.'वन नेशन वन रेशन' योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य दिले जाणार आहेत. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. सदर योजनेच्या लाभ घेण्याकरिता स्थानिकांना प्राधान्य राहणार आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या