शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:01 IST

संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देपोर्टेबिलिटीद्वारा पुरवठा : धान्य देण्याच्या दुकानदारांना सूचना, दरमहा २० हजारांवर लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात 'वन नेशन वन रेशन'ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे. सदरची योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दरमहा २० हजारांवर लाभार्थ्यांना या प्रणालीव्दारे लाभ दिला जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांिगतले.असे आहे कार्डनिहाय वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो मोफत तूर किंवा चना डाळ देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात एप्रिल मे व जून या तीन महिन्यासाठी प्रतिमहिना १७८ मेट्रिकटन तूरडाळ व २६७ टन चणाडाळ उपलब्ध झाली आहे. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रतिकार्ड १५ किलो गहू, ३ रुपये किलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्डावर २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदळाचे वितरित केले जात आहे.'वन नेशन वन रेशन' योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य दिले जाणार आहेत. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. सदर योजनेच्या लाभ घेण्याकरिता स्थानिकांना प्राधान्य राहणार आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.- अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या