शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

१.४७ लाख शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

अमरावती : नियमित पीककर्ज भरणा केल्यास व्याज सवलत देण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. याबाबत रीतसर ...

अमरावती : नियमित पीककर्ज भरणा केल्यास व्याज सवलत देण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. याबाबत रीतसर जीआर निघेल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील नियमित १.४७ लाख कर्जदारांनी पीककर्जाचा भरणा ३० जूनपर्यंत केल्यास त्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. तसे बदल डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निकषात करण्यात येणार आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात नियमित कर्जदारांंना कृषी कर्जासाठी सवलत देण्याची घोषणा केलेली आहे. शासनाचे ३ डिसेंबर २०१२ चे शासनादेशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निकषात बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर मुदतीत परतफेड झाल्यास ३ टक्के व्याज सवलत मिळते व १ ते ३ लाखांपर्यंतचे कर्ज मुदतीत म्हणजेच ३० जूनपर्यंत भरणा केल्यास १ टक्क्यांपर्यंत व्याजात सवलत मिळते. विशेष म्हणजे या योजनेत सर्वच बँका कव्हर करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी नाबार्डकडून जिल्हा बँकेला व तेथून गावागावांतील विकास सोसायटींमार्फत खातेदारांना कर्जपुरवठा करण्यात येतो. यात एक लाखांपर्यंतचे कर्ज शून्य दराने शेतकऱ्यांना मिळते. मात्र जिल्हा बँकेला हे सहा टक्क्यांपर्यंत पडते. यात प्रत्येकी केंद्र व राज्य शासन तीन टक्के व्याज देते. एक ते तीन लाखांच्या व्याजासाठीदेखील राज्य शासन तीन व केंद्र शासन दोन टक्के रक्कम देते. आता ही सवलत तीन लाखांपर्यंतच्या नियमित कर्जधारकास मिळणार आहे. मात्र, यातील निकष प्रत्यक्ष जीआरमध्ये स्पष्ट होणार आहे.

बॉक्स

६० हजार शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांची सवलत

शासनाने दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, नियमित शेतकऱ्यांना कुठलाही लाभ न दिल्याने या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत लाभ देण्याचे आतापर्यंत कित्येकदा आश्वासन देण्यात आले व बुधवारी वित्तमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यात किमान ६० हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

कोट

जोवर याविषयीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्यात काय निकष आहे, हे पाहिल्यावर भाष्य करणे

अधिक उचीत होईल. जिल्ह्यात सध्या १.४७ लाख नियमित शेतकरी आहे व त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपर्यंत कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे.

- संदीप जाधव,

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

पाईंटर

नियमित कर्जदार :१,४७,४६०

बँकाद्वारे कर्जवाटप :१३२१.१४ कोटी

राष्टीयीकृत बँकाचे खातेदार : ९४,१८३

ग्रामीण बँकांचे खातेदार :१,५२९

जिल्हा बँकेचे खातेदार : ५१,७४८