शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

गोवंशहत्या बंदीनंतरही बेलोऱ्याचा कातडीबाजार सुरुच

By admin | Updated: July 27, 2016 00:07 IST

राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह : कोट्यवधींची उलाढालअमरावती : राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे. येथे गोवंशाचे कातडे आणून विकले जात असून दर रविवारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे वास्तव आहे. अकोला महामार्गालगत सुरु असलेला गोवंशाचा हा कातडी बाजार पोलिसांना दिसत नाही काय? , यावर चिंतन करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आहे.मागील आठवड्यात चांदूरबाजार नजीकच्या खरवाडी येथे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने तीन निष्पापांचा बळी घेतल्यानंतर समाजमन सुन्न झाले. मध्यप्रदेश तसेच राज्याच्या सीमेवरुन अमरावती जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक, मांसविक्री होत असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, गोवंशाचा कातडी बाजार सुरु असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही. बेलोरा येथील कातडी बाजारात मध्यप्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच आंध्रप्रदेशातून गोवंशाचे कातडे विकावयास आणले जाते. बेलोरा (विमानतळ) येथील कातडी बाजारात देशभरातून व्यापारी कातडे खरेदीसाठी दाखल होतात. कोलकाता, हैद्राबाद, बंगळूर, मुंबई, दिल्ली आदी शहरांतून कातडे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कातडे व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. बेलोरावासी त्रस्तअमरावती : बेलोरा येथील गोवंश कातडी बाजार हा लोणी (टाकळी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यास सर्वस्वी जबाबदार आहे. दर रविवारी या बाजारात शेकडो वाहनांद्वारे गोवंशाचे कातडे आणले जात असताना ग्रामीण पोलिसांनी एकही कारवाई करु नये, ही बाब चिंतनीय मानली जात आहे. बेलोऱ्याचा कातडी बाजार विदर्भात सर्वात मोठा गणला जातो. बेलोरा कातडी बाजार परिसर लागला की वाहन चालक, नागरिकांना नाकाला हात लावूनच पुढे सरकावे लागते. या भागात अतिशय घाणरडा असा दर्प ही बाब नित्याचीच झाली आहे. पोलिसांना पुरविली जाते रसदबेलोर येथे गोवंशाचा कातडी बाजार नियमीत सुरु ठेवण्यासाठी लोणी पोलिसांना मोठी रसद कातडी व्यावसायीकांकडून दिली जात असल्याची माहिती आहे. हा बाजार पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय सुरु राहू शकत नाही, असे बेलोरा येथील काही ग्रामस्थांचे म्हणने आहे. या कातडी बाजारामुळे बेलोरावासियांचे जगणे कठीण झाल्याची कैफियत ‘लोकमत’ कडे मांडण्यात आली आहे. (वार्ताहर)